घरदेश-विदेशपीएम मोदींच्या भाषणांवर पुस्तक; प्रकाशनावेळी व्यंकय्या नायडू आणि आरिफ खान यांच्याकडून मोदींवर...

पीएम मोदींच्या भाषणांवर पुस्तक; प्रकाशनावेळी व्यंकय्या नायडू आणि आरिफ खान यांच्याकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि आरिफ खान यांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. एम व्यंकय्या नायडू शुक्रवारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व बाजूंच्या राजकीय नेतृत्वाला वारंवार भेटले पाहिजे, ज्यामुळे विरोधी पक्षांना त्यांच्या पद्धतींबद्दल काही गैरसमज दूर करण्यास मदत होईल. मोदींच्या भाषणावरील पुस्तकाचे प्रकाशन करताना नायडू यांनी आरोग्य, परराष्ट्र धोरण, तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले आणि जग आता भारताचा उदय ओळखत असल्याचे उद्गार काढले.

नायडू म्हणाले की, भारत आता एक शक्तीशाली देश बनला आहे, त्यांचा आवाज आता जगभर ऐकू येत आहे. इतक्या कमी वेळात ही काही सामान्य गोष्ट नाही. “सबका विकास सबका विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पीक्स’ (मे 2019-मे 2020)” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नायडू म्हणाले की, हे त्यांचे कार्य, ते लोकांना देत असलेले मार्गदर्शन ज्यामुळे भारत प्रगती करत आहे. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

- Advertisement -

नायडू म्हणाले की, पंतप्रधानांच्या कामगिरीबाबत काही वर्गांना अजूनही काही गैरसमजांमुळे, कदाचित काही राजकीय मजबुरीमुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप आहेत. कालांतराने हे गैरसमजही दूर होतील, पंतप्रधानांनी या बाजूला आणि त्या बाजूला शक्य तितक्या राजकीय नेतृत्वाच्या अनेक घटकांना भेटाले पाहिजे. राजकीय पक्षांनीही मोकळे मन ठेवावे आणि जनतेच्या जनादेशाचा आदर केला पाहिजे. त्यांनीही खुल्या मनाचे असले पाहिजेत… तुम्ही शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहात हेही तुम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे, सर्व पक्षांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, पंतप्रधानांची संस्था, राष्ट्रपतींची संस्था, मुख्यमंत्र्यांची संस्था. सर्व संस्थांचा आदर केला पाहिजे.

आरिफ मो. मुस्लिमांमधील तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा केल्याबद्दल खान यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. ते म्हणाले की, यापूर्वीचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही म्हटले होते की, मुस्लिम महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कायदा करू शकले नाहीत ही त्यांची सर्वात मोठी खंत आहे. नेहरू मुस्लिम महिलांना न्याय देण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकले नाहीत. मोदींनी तसे धाडस केले. या निर्णयाचे महत्त्व दशकांनंतरच समजेल.


‘उत्साहामध्ये या, शिस्तीने या…’; दसरा मेळाव्याच्या परवानगीनंतर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -