पार्सल सेवा सुरू राहणार – मुख्यमंत्री
बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देणार – मुख्यमंत्री
परवानधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये देणार – मुख्यमंत्री
अधिकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देणार – मुख्यमंत्री
पुढच्या एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी गोरगरिबांसाठी मोफत देणार – मुख्यमंत्री
लाभार्थीसाठी पुढच्या एक महिन्यासाठी मोफत धान्य देणार – मुख्यमंत्री
कारण नसतानाही घराबाहेर पडता येणार नाही – मुख्यमंत्री
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद
सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार – मुख्यमंत्री
राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी लागू
उद्या संध्याकाळपासून १४४ (संचारबंदी) कलम लागू – मुख्यमंत्री
उद्या रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होतील – मुख्यमंत्री
नाईलाजाने बंधने घालावे लागणार – मुख्यमंत्री
कोरोनाशी लढण्यासाठी निवृत्त झालेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसने सरकारच्या सोबत या – मुख्यमंत्री
आरोग्य सुविधा आणखीन वाढवणार – मुख्यमंत्री
राज्यातील रुग्णवाढ भयावह – मुख्यमंत्री
लसीकरणामुळे तिसरी लाट मंद होईल – मुख्यमंत्री
लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती यायला काही दिवस लागतात – मुख्यमंत्री
राज्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला – मुख्यमंत्री
जीएसटी परताव्यासाठी मुदतवाढ द्या, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
एक मृत्यू आणि रुग्ण लपवलेला नाही – मुख्यमंत्री
हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची परवानगी केंद्राकडे मागितली – मुख्यमंत्री
राज्यात ऑक्सिजनची आणखी गरज लागणार – मुख्यमंत्री
राज्यात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा – मुख्यमंत्री
आता चर्चा करण्याची वेळ निघून गेलीय – मुख्यमंत्री
कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य सुविधांवर भार पडलाय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय – मुख्यमंत्री
कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे – मुख्यमंत्री
वाढवलेल्या सुविधा अपुऱ्या पडतायंत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना चाचणीचा अहवाल यायला उशीरा होतोय
आज राज्यात ६० हजार २१२ रुग्णांची नोंद – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला गुढीपाढव्याच्या दिल्या शुभेच्छा
मुंबईत गेल्या २४ तासांत ७ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ११ हजार २६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ३५ हजार १७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ७८६ जणांचा मृत्यू झाला असून ४ लाख ३४ हजार ९४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ८६ हजार ८६६ जणांवर उपचार सुरू आहेत.
#CoronavirusUpdates
१३ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/xo1zrac3Fb— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 13, 2021
नागपुरमध्ये २४ तासांत ६ हजार ८२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार ५१८ जण घरी होऊन बरी गेले आहेत. त्यामुळे आता नागपुरमधील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९१ लाख ४३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख २४ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच सध्या ६१ हजार ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra: Nagpur district reported 6826 new #COVID19 cases, 3518 recoveries, and 65 deaths, in the last 24 hours, as per Civil Surgeon, Nagpur.
Total cases: 2,91,043
Total recoveries: 2,24,078
Active cases: 61,062
Death toll: 5,903— ANI (@ANI) April 13, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार असल्याचे समोर येत आहे. यावेळी लॉकडाऊनची मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारतात रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे. लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिल्यानंतर आता ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ अर्थात ‘डीसीजीआय’कडून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती ‘रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’कडून देण्यात आली आहे. ‘डीसीजीआय’ने सोमवारी रात्री उशिरा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
विचारवंत लेखक, अभिनेते वीरा साथीदार यांचे निधन झाले. कोरोना संसर्गाशी झुंज देताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आठ दिवसांपूर्वी साथीदार यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान गेली पाच दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. मात्र १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुशिल चंद्रा यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला असून त्यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली
वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालयातील उपचार घेत आलेल्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. सोमवारी या परिसरात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणाऱ्या ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू हे ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यावर सोमवारीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली. यानुसार देशात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा १ कोटी ३६ लाखांवर पोहोचला आहे. तर या कालावधीत देशात ८७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ७१ हजार ५८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे
India reports 1,61,736 new #COVID19 cases, 97,168 discharges and 879 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,36,89,453
Total recoveries: 1,22,53,697
Active cases: 12,64,698
Death toll: 1,71,058Total vaccination: 10,85,33,085 pic.twitter.com/ndxnchFoIp
— ANI (@ANI) April 13, 2021
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेमधील ग्रामस्थांसोबतच बंदोबस्तासाठी असलेल्या २ पोलीस अधिकारी आणि ९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर बावधनमधील आणखी १४ ग्रामस्थांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बावधनमधील एकूण कोरोना पॉझिटिव्ह ग्रामस्थांची संख्या ७५ झाली आहे. वाई तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमूहूर्तावर आकर्षक सजावट केली जाते. मात्र यंदा कोरोनाचं सावट असलं तरीही काही प्रथा, परंपरा मात्र खंडीत न करता सुरूच आहे. झेंडूच्या फुलांचा वापरत करत डोळ्यांच पारणं फेडणारं आकर्षक रंगसंगतीनं ही नयनरम्य आरास साकारण्यात आली आहे.
सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा अत्यल्प साठा
सांगली जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा अत्यल्प साठा असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांकडे केवळ १९९ रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती राज्य औषध विक्रेता परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. जिल्ह्यात सध्या ५७८जणांची प्रकृती गंभीर असून या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावी अशी मागणी केली जात आहे.