Homeदेश-विदेशModi Govt : ‘मोदी हम करे सो कायदा’ म्हणून..., ठाकरे गटाची चौफेर...

Modi Govt : ‘मोदी हम करे सो कायदा’ म्हणून…, ठाकरे गटाची चौफेर टीका

Subscribe

मुंबई : देशात समान नागरी कायदा वगैरे लागू करण्याची राजकीय भाषा नव्याने सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका कोणत्याही वेळी जाहीर होतील. त्यामुळे मोदी आणि त्यांचे सरकार संविधान, कायदा याबाबत काय भूमिका घेतील, ते सांगता येत नाही. समान नागरी कायदा आणावा वगैरे हालचाली सुरू आहेत, पण आजच्या कायद्याचे जे विडंबन सुरू आहे ते कसे रोखायचे? मनी लॉण्डरिंगसारख्या कायद्यांना भारतीय संविधान किंवा कायद्याच्या पुस्तकात समाविष्ट न करता ‘मोदी हम करे सो कायदा’ म्हणून नव्या पुस्तकात समाविष्ट करा, अशी चौफेर टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

कायद्याचे समान तत्त्व देशभरात कोठेच दिसत नाही आणि न्यायाचा तराजू तटस्थ नाही हेच चित्र आहे. समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आणि नंतर आर्यनला या प्रकरणातून वाचविण्यासाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितले, असे एक प्रकरण समोर आले. त्या प्रकरणात आर्यनला तुरुंगाची हवा खावी लागली आणि एकच खळबळ उडाली. पुढे आर्यनकडे ड्रग्ज नव्हतेच, असा अहवाल समोर आला. त्यानंतर वानखेडे वादात सापडले. पण याच प्रकरणी ‘ईडी’ने वानखेडे यांच्या विरोधात मनी लॉण्डरिंगचे गुन्हे दाखल केले. वानखेडे यांना अटक होऊ शकते, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

वानखेडे यांच्यावर याप्रकरणी सीबीआयनेही गुन्हे दाखल केल्याने कालचा हीरो आज अडचणीत सापडला आहे. वानखेडे आता हायकोर्टात जाऊन दाद मागणार आहेत. त्याने काय साध्य होणार? अटकेसारखी कठोर कारवाई टाळायची असेल तर वानखेडे यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागेल. देशातला हाच एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा – SANJAY RAUT : ”…तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा”; संजय राऊतांची सडकून टीका

पुण्यातील काही गुंडांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हणे ‘परेड’ काढली. आपण आयुक्त आहोत तोपर्यंत गुंडागर्दी चालणार नसल्याची दमबाजी त्यांनी केली, पण त्याच पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या ‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या नेत्यांवर राजकीय गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांची गाडी फोडली. वागळे यांचा खून करण्याचीच योजना होती. हे सर्व गुंड व्हिडीओ चित्रणात स्पष्ट दिसत आहेत. मग या गुंडांची ‘वरात’ काढण्याची हिंमत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी का दाखवली नाही? असा प्रश्न या अग्रलेखात करण्यात आली आहे.

गुंड हा गुंडच असतो. तो अजित पवार, फडणवीस यांच्या गटात सामील असेल तर त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस पाठीशी घालणारा कायदा आम्हाला नको आहे. जर समीर वानखेडेंची ‘परेड’ ‘ईडी’ करणार असेल तर गायकवाडांकडून गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा स्वीकारणारा ‘मिंधे’ मुख्यमंत्री ‘ईडी’च्या कृपेस पात्र ठरून मोकळा कसा राहू शकतो? प्रश्न साधा आहे, पण राष्ट्रहिताचा आहे, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट