नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्यक्रम स्पष्ट आहेत. त्यांच्याकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही पण क्रिकेट सामना पाहण्यासाठी पूर्ण वेळ आहे.” असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांना लगावला आहे. रविवारी रात्री सामना संपल्यानंतर रमेश म्हणाले की, आता ते (पंतप्रधान) राजस्थान आणि तेलंगणामध्ये जाऊन काँग्रेसला शिव्या देतील. (Narendra Modi can go to see World Cup Final but not to Manipur Congress Jayaram Ramesh criticizes Prime Minister Modi)
आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदीही आले होते.
काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी वेळ काढला. आता (उद्यापासून) ते राजस्थान आणि तेलंगणात जाऊन काँग्रेसला शिव्या घालतील पण तरीही त्यांना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही, तिथे अजूनही तणाव आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीम इंडियाचे चांगले खेळ केल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, संपूर्ण विश्वचषकातील तुमच्या (भारतीय क्रिकेट संघाच्या) कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
PM found time to be at the stadium in Ahmedabad he got named after himself. From tomorrow, he’ll be back to abusing & defaming Congress in Rajasthan & Telangana. But still, he hasn’t found it fit & proper to visit Manipur that is still tense & suffering. His priorities are clear!
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) November 19, 2023
पुढच्या वेळी आम्ही जिंकू- राहुल गांधींनी टीम इंडियाचं केलं कौतुक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले. ते म्हणाले, “टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली, जिंका किंवा हरा – आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि यापुढेही करत राहू. विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदनही केले. त्यांनी सामन्यापूर्वीच टीम इंडियाला शुभेच्छाही दिल्या होत्या.
Team INDIA, you played solidly well through the tournament!
Win or lose – we love you either way and we will win the next one.
Congratulations to Australia for a well deserved World Cup victory.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2023
टीम इंडियाच्या डोळ्यांत अश्रू, पण पंतप्रधान का हसले- काँग्रेस
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ते हसत आहेत. ते म्हणाले, “आमच्या संघाच्या डोळ्यांत अश्रू आहेत, देशाचे हृदय तुटले आहे, पण ते (पीएम) इतके का हसत आहेत.”
Our team is in tears, the nation is heart broken — what is he smiling so widely about? pic.twitter.com/hp88TQlWbI
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 19, 2023
पूर्ण उत्कटतेने लढणे जास्त महत्त्वाचे – प्रियंका गांधी
काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही टीम इंडियाचे कौतुक केले. प्रियांका गांधी म्हणाल्या की, जिंकणे आणि हरणे यापेक्षा पूर्ण जोशाने लढणे महत्त्वाचे आहे. टीम इंडियाने संपूर्ण मालिकेत चमकदार कामगिरी केली. अभिमानाने अंतिम फेरी गाठली. त्यांनी टीम इंडियाला चिअर अप केले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
(हेही वाचा मोहम्मद शमीच्या कामगिरीवर मुख्यमंत्री आदित्यनाथही फिदा; पाच कोटींचे दिले गिफ्ट )