घरदेश-विदेशकाँग्रेसला भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही - नरेंद्र मोदी

काँग्रेसला भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही – नरेंद्र मोदी

Subscribe

माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी ५ वर्षांसाठी गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा, असंही मोदी म्हणाले.

छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर निशाणा साधला. ‘नेहरुंमुळे चहावाला पंतप्रधान बनला अशी चर्चा लोक करत आहेत. मात्र, असं असेल तर गांधी घराण्याबाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यर्त्याला पाच वर्षांसाठी पक्षाचा अध्यक्ष करा’, असं आवाहन मोदींनी काँग्रेसला दिलं. मध्यप्रदेशच्या प्रचारसभेआधी आज छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये मोदी यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेदरम्यान मोदी म्हणाले, की ‘सरकारनं नेहमी गरिबांसाठी काम करायला हवं. कोणताही भेदभाव न करता आमचं सरकार सगळ्यांसाठीच काम करतं. अटलबिहारी वाजपेयींनी जेव्हा छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंडची निर्मिती केली तेव्हा कोणतंही आंदोलन झालं नव्हतं. मात्र, ज्यावेळी काँग्रेसने तेलंगणाची निर्मिती केली तेव्हा खूप मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगणाला मोठा फटकाही बसला. यावेळी ‘काँग्रेसला भावाभावांमध्ये भांडणं लावल्याशिवाय चैन पडत नाही’, अशी टीकाही मोदी यांनी केली.


वाचा: ४ पिढ्यांचा हिशोब द्या, मग ४ वर्षांचा देईन – मोदी

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, की ‘मी रोजच सरकारने गेल्या ४ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देतो. तरीही काहीजण एक चहावाला पंतप्रधान कसा झाला, हाच प्रश्न चघळत राहतात. जोपर्यंत लोकशाही समजून घेत नाहीत तोपर्यंत हे लोक चहावाल्याला बोलत राहणार. काँग्रेसचे लोक सांगतायत की केवळ नेहरुंच्या कृपेमुळे एक चहावाला पंतप्रधान झाला. मात्र, असं वक्तव्य करणाऱ्यांनी पाच वर्षांसाठी गांधी कुटुंबाच्या बाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा, असंही मोदी म्हणाले.’

- Advertisement -

चार पिढ्यांचा हिशोब द्या…

यावेळी नोटबंदीच्या मुद्द्यावरुनही मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. नोटबंदीमुळे देशात कुणालाही त्रास झालेला नाही पण गांधी कुटुंब त्या मुद्द्यावरुन रडगाणं गात आहे. मात्र, काहीही झालं तरी माझी भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरुच राहील, असंही मोदी म्हणाले. आम्ही चार वर्षात काय केलं? याचा हिशोब मागणाऱ्यांच्या चार पिढ्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी त्यांच्या चाप पिंढ्यांचा आधी हिशोब द्यावा. जर त्यांच्याकडे याचा हिशोब नसेल तर आम्हाला प्रश्न विचारण्याचा त्यांना काय अधिकार? असा सवालही मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -