घरदेश-विदेशनव्या कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचा आज ‘भारत बंद’चा नारा

नव्या कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचा आज ‘भारत बंद’चा नारा

Subscribe

शेतकरी संघटना आज देशव्यापी आंदोलन करणार

काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली. तर शेतकरी संघटना आज देशव्यापी आंदोलन करणार असून नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. मात्र भाजपने मात्र काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली आहे. दरम्यान, संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या हिताविरोधातील केंद्राच्या धोरणांविरोधात काँग्रेसने पुढील दोन महिने जनआंदोलन करण्याचे ठरवले असून मंगळवारी पंजाब-हरियाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. देशभर पत्रकार परिषदा घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात येणार असून १४ नोव्हेंबर रोजी पं. नेहरूंच्या जयंतीदिनी स्वाक्षरींचे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिले जाईल. २८ सप्टेंबर रोजी राज्या-राज्यांतील काँग्रेसचे नेते राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये निदर्शने करण्यात येणार असून महात्मा गांधींच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी किसान दिवस पाळला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर १० ऑक्टोबर रोजी राज्या-राज्यांमध्ये शेतकरी परिषदा घेतल्या जातील.


यशवंत जाधव यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी शिवसेनेचा एक गट सक्रीय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -