घरदेश-विदेशनिवडणुका संपल्यावर दरवाढ, हे वित्त नियोजन आहे का? जयंत पाटलांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना...

निवडणुका संपल्यावर दरवाढ, हे वित्त नियोजन आहे का? जयंत पाटलांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना सवाल

Subscribe

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांवर साधला निशाणा

देशात इंधन दरवाढीने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. अनेक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पेट्रोल हे शंभरी पार गेलं आहे. इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की दरवाढ ही ठरलेलीच! हे काय वित्त नियोजन आहे का? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जयंत पाटील यांनी केला आहे.

कोरोना परिस्थितीत देशात आणि राज्यात वाढलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९२.०५ रुपये आणि डिझेलची किंमत ८२.६१ रुपये प्रति लीटर झाली आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल १००.७५ पैसे तसेच डिझेलही ९०.६८ रुपये दराने विक्री केली जात आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्रालय एका वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा असे मत जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -