घरताज्या घडामोडी'स्थलांतरामुळे काम सुटलेल्यांना मिळणार रोजगार'

‘स्थलांतरामुळे काम सुटलेल्यांना मिळणार रोजगार’

Subscribe

ज्या लोकांचे स्थलांतरामुळे काम सुटले आहे, अशा व्यक्तींना आता रोजगार मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हातचे काम गेले. त्यामुळे बऱ्याच मजुरांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनेक मजुरांना स्थलांतरित करावे लागल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे ज्या लोकांचे स्थलांतरामुळे काम सुटले आहे, अशा व्यक्तींना आता रोजगार मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब कल्याण योजनेबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये सहा राज्यांमधील जवळपास ११६ जिल्ह्यांमध्ये शहरांमधून सर्वाधिक मजूर परतले आहेत. दरम्यान, या मजुरांच्या कौशल्याचा त्यांच्या कामाचा तपशील केंद्राकडे असून त्या दृष्टीने आखणीही करण्यात आली आहे.

- Advertisement -

याठिकाणाहून अभियानाची सुरुवात करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभ केला असून खडगिया जिल्ह्यातून या अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या श्रमिक १२५ दिवसांसाठी विविध प्रकल्पांवर काम करतील. त्यांची कौशल्य पाहता विहिरी खोदणे, रस्तेबांधणी करणे, इमारत बांधणीची कामे करणे आदी कामे दिली जातील.

२५ योजनांना एकत्र आणले जाणार

तसेच गरीब कल्याण योजनेअंतर्गत १२५ दिवसांमध्ये सरकारच्या जवळपास २५ योजनांना एकत्र आणले जाणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक योजनेला मजुरांना कशा प्रकारे फायदा होईल यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठरलं! राजू शेट्टी ‘स्वाभिमानी’मधूनच विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -