पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वातावरण गरज झाले आहे. कोणत्याही क्षणी युद्ध होईल अशी भिती पाकिस्तानकडून वर्तवली जात आहे. याबद्दल दोन्ही देशांनी अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र पाकिस्तान अंतर्गत काश्मीर (पीओके) मधील ग्रामीण भागातील लोकांना पाकिस्तानने बंकर बनवण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही देशा अंतर्गत तणावाची स्थिती असल्यामुळे हा सल्ला पाकिस्तानी सरकारकडून देण्यात आला आहे. भारताकडून हल्ला झाल्यावर येथील ग्रामीण रहिवाशांनी सुरुक्षित राहावे असे पाकिस्तान सरकारने सांगितले आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या वेळीही पाकिस्तान सरकारने येथील ग्रामीण रहिवशांना असाच सल्ला दिला होता.
High alert issued by #SDMA in areas nearby #LOC on current situation in#IndianOccupiedKashmir after #PulwamaAttack pic.twitter.com/p6QuRN4Alu
— Saqib Ali Haidri (@SaqibAliHaidri) February 21, 2019
काळजी घेण्याचा सल्ला
भारताकडून होणाऱ्या हल्ल्याची सुरुवात पाकिस्तान अंतर्गत काश्मीर पासून होणार आहे. यामुळे येथील गांवामध्ये नागरिकांची सुरक्षेची जवाबदारी पाकिस्तानी सैन्याची आहे. रात्रीच्या सुमारास या गावांच्या रस्त्यावरील आणि घरातील लाईट बंद केली जाते. याच बरोबर प्राण्यांना एलओसीजवळ घेऊन न जाण्यास पाकिस्तानने सांगितले आहे.