घरक्रीडाजिंकलेस भावा...कमिन्सचे भान, ३७ लाख दिले पंतप्रधान निधीला!

जिंकलेस भावा…कमिन्सचे भान, ३७ लाख दिले पंतप्रधान निधीला!

Subscribe

भारतामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहा:कार माजवला असताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धा खेळवली जात असल्याच्या मुद्यावरून आता हळूहळू चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या आयोजनासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या पॅट कमिन्सने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज कमिन्स कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळत असून गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीत चमक दाखवत आहे. कमिन्सने यासंदर्भात एक मेसेज लिहिला आहे. ‘आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटलो आहे. या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल, असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन आहे.

जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदतनिधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावे. लोकांनी आपल्या भावनांना योग्य पद्धतीने वापरु. त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल. मी केलेली मदत फार नाहीय; पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल, अशी मला आशा आहे.’ कमिन्सच्या या मदतीनंतर सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे, कमिन्सची ही मदत घेताना मोदी सरकारला कोरोना ही देशांतर्गत बाब असल्याचे आठवले नाही का, असा प्रश्न नेटवर अनेकांनी उपस्थित केला आहे. शेतकरी आंदोलनाच्यावेळी अमेरिकन पॉप स्टार रिहानाने शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी तसेच भारत सरकारने शेतकरी आंदोलन हा देशाची अंतर्गत बाब असल्याचे म्हणत परदेशी सेलिब्रिटींनी यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन बोलावे, अशी भूमिका स्पष्ट केली होती. आता कोरोना कालावधीमध्ये एका परदेशी खेळाडूनेच केलेल्या मदतीवरून नेटकर्‍यांनी मोदी सरकारच्या याच जुन्या भूमिकेची आठवण त्यांना करून दिलीय.

- Advertisement -

आयपीएलमधील पैसा लसीकरणासाठी द्यावा- अभिनव बिंद्रा
आयपीएलमधून मिळणारा बराचसा पैसा बीसीसीआयने लसीकरणासाठी वापरावा. आयपीएल स्पर्धा म्हणजे चॅरिटी नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, मी जर बीसीसीआयच्या जागी असतो, तर आयपीएलमधून मिळालेला बराचसा पैसा लसीकरण किंवा इतर मदतकार्यांसाठी दिला असता. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने म्हटले आहे. क्रिकेटपटूंना सध्याच्या परिस्थितीतही आयपीएल खेळायला मिळणे हे त्यांचे भाग्य आहे. मात्र, क्रिकेटपटूंनी केवळ स्वतःमध्ये व्यस्त राहून देशातील परिस्थितीकडे कानाडोळा करू नये, असेही बिंद्रा सांगतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -