१७ व्या लोकसभा निवडणूकांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. देशभर भाजपचे कमळ चांगलेच फुलले आहे. त्यामुळे आनंदी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही थोडक्यात ट्विटद्वारे मनोगत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटमध्ये त्यांनी विजयी भारताचे सूत्र मांडले आहे.
सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
Together we grow.
Together we prosper.
Together we will build a strong and inclusive India.
India wins yet again! #VijayiBharat
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) May 23, 2019
भारत पुन्हा जिंकत आहे – पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आपण सर्व एकत्रित वाढलो. एकत्र यशस्वी होतो. आपण एकत्र सक्षम भारताची निर्मिती करू. भारत पुन्हा जिंकत आहे. विजयी भारत. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोडक्यात विजयी भारताचे सूत्र मांडले आहे. देशात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विजयी घोडदौड सुरू आहे. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या नवख्या उमेदवारांनीही पट्टीच्या उमेदवारांचा पराभव केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.