देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांवर पोहोचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ असताना आता केंद्रातील हालचालींनाही वेग आला आहे. एका आठवड्यात कॅबिनेटच्या मंत्र्यांची दुसऱ्यांदा बैठक होत असून काही महत्त्वाचे निर्यण घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाचे दोन टर्म काही दिवसांपूर्वीच पूर्ण केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी कॅबिनेट्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली होती. यावेळी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटापासून दिलासा देण्यात येईल, अशा काही घोषणा केंद्राकडून करण्यात आल्या.
Delhi: Prime Minister Narendra Modi chaired Union Cabinet meeting today at 7, Lok Kalyan Marg. pic.twitter.com/KiyCij3Ubs
— ANI (@ANI) June 3, 2020
हेही वाचा –
Cyclone Nisarga: रेल्वे-विमान सेवांवर परिणाम; मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल