राष्ट्रीय स्वंय सेवक संघ महिला विरोधी आणि धर्माची दलाली करतात असा घणाघात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. महिला काँग्रेसच्या ३८ व्या वर्धापनदिनी राहुल गांधींनी बोलताना संघाचे प्रमुख मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या विचारसरणीशी कोणतीही तडजोड करु शकत नाही. काँग्रेसची विचारसरणी ही महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची आहे तर भाजपची विचारसरणी महिला विरोधी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संघचालक मोहन भागवत यांचा कोणत्याही महिलेसोबत फोटो पाहिला आहे का? असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांच्या मुद्यावरुन भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. आरएसएस आणि भाजप हे महिलांविरोधी आणि महिला शक्तीचं दमन करणारे आहेत. गांधींजींच्या फोटोमध्ये तुम्हाला महिला दिसतील परंतु मोहन भागवत यांच्यासोबत कोणत्याही महिलेचा फोटा पाहिला आहे का? भाजप कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? भाजपमधील हिंदू खोटे असून ते केवळ हिंदू धर्माचा वापर करतात असा आरोप राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, लक्ष्मी की शक्ति- रोजगार, दुर्गा की शक्ति -निडरता, सरस्वती की शक्ति- ज्ञान या शक्ती भाजपने कमी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व शक्ती महिलांच्या हातातून हिसकावले असून तीन ते चार लोकांच्या हातात दिली आहे. काँग्रेस सर्व धर्मांचा पक्ष आहे. भाजपची घाबरा आणि घाबरावा अशी विचारसणी आहे. भाजपने हीच विचारधारा देशात पसरवली आहे. भाजपची आणि संघाची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. देशातील इतर विचारसणींसोबत तडजोड करु शकतो मात्र भाजपसोबत तडजोड करु शकत नाही असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
महिला भयभीत आहेत
देशातील महिला भयभीत आहेत. मीडियासुद्धा भयभीत झाली आहे. खरं तर वास्तव असे आहे की मोदींकडे शक्ती नसल्यामुळे ते भीतीने कापत आहेत. यामुळे भिऊन पळालेत. भाजपच्या काळामध्ये देशातील महिला भयभीत आहेत. भाजपने आणि संघाने कोणत्याही महिलेला पंतप्रधान होऊ दिले नाही. मोदी संपुर्ण जीवन खोटं बोलत आले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : योगीही म्हणतात ‘मी पुन्हा येईन’, रेकॉर्ड तोडायलाच आलोय सांगत फडणवीसांच्या सुरात सूर