समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसने देखील माध्यमांवर बहिष्कार टाकला आहे. एक महिना चॅनेलवर न जाण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
.@INCIndia has decided to not send spokespersons on television debates for a month.
All media channels/editors are requested to not place Congress representatives on their shows.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 30, 2019
समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसने देखील माध्यमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जिंकून सलग दुसर्यांदा सत्ता आपल्याकडे राखली आहे. या निकालानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाल यांनी एक महिना माध्यमांवरील डिबेटवर प्रवक्त्यांना जाण्यास बंदी घातली आहे. मध्यमांवर होणारे पक्षांमधील वादविवादाचे कार्यक्रम घेतले जातात. मात्र त्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास काँग्रेसने बंदी घातली आहे.