चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. यात भारताच्या कर्नल हुद्द्याच्या लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. मात्र या भारत- चीन संघर्षानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ट्वीट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
चीन के मुंहजोरी को कब मिलेगा करारा जबाब?बिना गोली चले हमारे 20 जवान शहीद होते है.हमने क्या किया?
चिनके कितने जवान मारे गये? चीन हमारे जमीन पर घुस गया है क्या?प्रधान मंत्रीजी इस संघर्ष के घडीमे देश आपके साथ है लेकीन सच क्या है?
बोलो.कुछ तो बोलो. देश सच जानना चाहता है.
जय हिंद!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
संजय राऊत यांनी ट्विट करत अनेक प्रश्न सरकारला विचारले आहेत, राऊत ट्विटमध्ये म्हणतात की, चीनला भारताकडून चोख प्रत्युत्तर कधी मिळणार? गोळीबारा शिवायच २० सैनिकांचा मृत्यू कसा झाल? चीनचे नेमके किती जवान मारले गेले? चीन भारताच्या जमीनीत घुसलं आहे का? संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे. पण नेमकं सत्य काय आहे. देशाला खरं ऐकायचं आहे? प्रतंप्रधान तुम्ही शुर आहात, योध्दा आहात. तुमच्या नेतृत्त्वाखाली भारत चीनला चोखला प्रत्यृत्तर देईल अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारने प्रश्न चिन्ह विचारले आहेत.
प्रधान मंत्री जी आप शुर और योद्धा हो..आपके नेतृत्त्वमे
देश चीन से बदला लेंगा..— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2020
गलवाण खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाल्याचं आता स्पष्ट झालंय. भारत-चीन संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली असून भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षात ठार झालेत.
हे ही वाचा – ‘मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान’,शहीद कर्नल यांच्या आईची प्रतिक्रीया!