घरताज्या घडामोडीमदरशांमध्ये 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मदरशांमध्ये 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शैक्षणिक सत्र 2022-23 पासून पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. यासंदर्भात केंद्र सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मदरशांमध्ये आठवीपर्यंत शिकणाऱ्या सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शैक्षणिक सत्र 2022-23 पासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. याबाबत केंद्र सरकारकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी मदरशांमध्ये 8वीपर्यंत शिकणाऱ्या सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरात 1 हजार रुपये दिले जातात, तर 6वी ते 8वीच्या वर्गातील शिष्यवृत्तीची रक्कम वेगळी आहे. (scholarship will not be available in madrassas till eighth grade central government issued order in Lucknow city)

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे आठवीपर्यंतच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याचे औचित्य नाही. आता प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती केवळ 9वी आणि 10वीच्या पात्र विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, मदरशांमध्ये, प्राथमिक शिक्षण परिषदेच्या शाळांप्रमाणे 1ली ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण, गणवेश, पुस्तके मोफत दिली जातात. यापूर्वी परिषद शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळत असे, मात्र काही वर्षांपूर्वी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात आल्यानंतर ती बंद करण्यात आली.

शिक्षणाच्या अधिकारांतर्गत 1ली ते 8वीपर्यंतचे शिक्षण मोफत असल्याचा आदेश अल्पसंख्याक विभागाकडून जारी करण्यात आला आहे. इतर आवश्यक वस्तूही विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाईल आणि त्यांचे अर्ज पाठवावेत.

- Advertisement -

शिष्यवृत्तीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. संस्थांनी पडताळणी करून अर्जही पाठवले आहेत. आता त्याच्या हार्ड कॉपीची मागणी करण्यात आली होती, मात्र अचानक ही प्रक्रिया थांबवण्यात आली. आता फक्त 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी जमा केली जाणार आहे.


हेही वाचा – आमच्या आराध्य दैवतांचा ‘भाजपाच्या आराध्य दैवतां’कडून अपमान; संजय राऊतांचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -