गेल्या पाच वर्षांपासून माझं नाव देखील माहिती नसलेल्या प्रियंका गांधी सध्या सातत्याने माझं नाव उच्चारत आहेत. ते आपल्या पतीच्या नावापेक्षा माझ्याच नावाचा जप जास्त करत आहेत, असे अमेठी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. याशिवाय स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील सडकून टीका केली. यासाठी इराणी यांनी अमेठीतील संजय गांधी हॉस्पिटल येथील घटनेचा दाखला दिला.
Smriti Irani,BJP candidate from Amethi on Priyanka Gandhi Vadra: She did not know my name 5 years back, now she keeps taking my name, such an accomplishment. Nowadays she takes her husband’s name less and my name more. pic.twitter.com/e8cJBvKI5E
— ANI UP (@ANINewsUP) May 6, 2019
स्मृती इराणी यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, ‘एखादा माणूस राजकारणात किती खालच्या पातळीवर जाईल, याचा कधी विचारही केला नव्हता. एका गरिब रुग्णाकडे मोदी सरकारचं आयुष्यमान भारत कार्ड होते. मात्र, ते हॉस्पिटल राहुल गांधींचे असल्याकारणामुळे त्याच्यावर उपचार झाले नाही. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अमेठीतील लोकांना उत्तर दिले पाहिजे.’
संजय गांधी अस्पताल के ट्रस्टी राहुल गांधी और प्रियंका वाड्रा जवाब दें अमेठी को – एक निर्दोष को क्यूँ मार दिया गया? pic.twitter.com/uWrknyMyZo
— Chowkidar Smriti Z Irani (@smritiirani) May 5, 2019
रुग्णालयाने फेटाळले आरोप
दरम्यान, संजय गांधी रुग्णालय प्रशासनाने स्मृती इराणींचा हा आरोप फेटाळला आहे. रुग्णांवर कधीही कुठल्याही प्रकारचे राजकारण केले जात नाही. स्मृती इराणी यांनी सांगितलेले रुग्ण नन्हेलाल मिश्रा यांना यकृताचा त्रास होता. त्यांच्यावर शक्य तेवढे उपचार आम्ही केले, असे रुग्णालयाचे एमडी कॅप्टन सूर्य महेंद्रसिंह चौधरी यांनी सांगितले. याशिवाय भाजपकडून त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
Smriti Irani: A person died as he was denied treatment at hospital where Rahul Gandhi is trustee,in Amethi just because he had Ayushman Bharat card. Ye parivaar itna ghinona hai ki ek nirdosh ko maut ke ghat utarne ko taiyar hai sirf isliye kyunki unhe apni rajneeti pyari hai pic.twitter.com/DersIyWwxs
— ANI UP (@ANINewsUP) May 6, 2019