घरदेश-विदेशमोदींमुळे जनता पीडित झाली - सोनिया गांधी

मोदींमुळे जनता पीडित झाली – सोनिया गांधी

Subscribe

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदींमुळे जनता पीडित झाली आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

‘मोदी पीडित असल्याचं भासवतात. मात्र, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची जनता पीडित झाली आहे’, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ५८ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक बोलावण्यात आली होती. याअगोदर १९६१ मध्ये भावनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्णीची बैठक झाली होती. आजची बैठक ही अहमदाबादमधील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी पूलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली गेली.

नेमकं काय म्हणाल्या सोनिया गांधी?

सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘राष्ट्रहितासंबंधी मुद्द्यांवर मोदी सरकार राजकारण करत आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता पीडित झाली आहे.’ यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर टीका केली. सरकाच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे. त्यामुळे आता देशातील जनतेला युपीए सरकारच्या काळातील यशस्वी योजनांबद्दल सांगण्याची गरज आहे. केंद्रातील भाजप सरकार खोटा प्रचार करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -