घरCORONA UPDATEआमच्या परवानगी शिवाय मजुरांना इतर राज्यात कामावर ठेवता येणार नाही - योगी

आमच्या परवानगी शिवाय मजुरांना इतर राज्यात कामावर ठेवता येणार नाही – योगी

Subscribe

काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असे योगी यांनी स्पष्ट केले.

लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमावली तयार करणार आहे. त्याचप्रमाणे राज्याबाहेर काम करणाऱ्या कामगारांसाठी नवीन धोरणंही आखणार आहेत. स्वत: योगींनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच यापुढे दुसऱ्या राज्यांना उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना कामावर ठेवायचे असेल तर त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने याविषयी माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, या पुढे कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामागांराच्या सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

योगी पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात परत आलेल्या कामगारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्या नोंदणी दरम्यानाच हे मजूर काय काम करताता याची माहिती घेण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही राज्याला जर मजुरांना नोकरी द्यायची असेल तर आम्ही दिलेल्या अटी राज्यांनी पुर्ण करणं बंधनकारक आहे.

या आयोगाच्या माध्यमातून स्थलांतरितांच्या प्रश्नांवर काम करुन त्यांचे शोषण केले जाणार नाही यासंदर्भात काळजी घेतली जाईल.  कामगारांना परत राज्यात आणल्यावर त्याची आरोग्य तपासणी आणि त्याच्या विलगीकरणाचे आवाहन राज्य सरकारसमोर होते असं योगी यांनी सांगितलं. पराज्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना आणि विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी बस गाड्यांची सोय करण्याचा निर्णय घेणारे योगी हे देशातील पहिले मुख्यमंत्री होते.

- Advertisement -

कामाची विभागणी

परराज्यातून परत आलेल्या मजुरांसाठी मंत्र्यांचे गट तयार करण्यात आले आहेत. मंत्र्यांमध्ये कामाची विभागणी करण्यात आली आहे. “एका गटाला परत आलेले मजूरांच्या पालन पोषणासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात काम करण्यास सांगण्यात आलं आहे. दुसऱ्या गटाला व्यवसाय आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय साधण्याचे काम दिलं आहे. या गटाने उद्योजकांशी संवाद साधून या मजुरांना काम मिळेल का यासंदर्भात चर्चा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अशी माहिती योगी यांनी दिली.


हे ही वाचा – Coronavirus- भारतातील ‘या’ २५ जिल्ह्यात कोरोनाचे वेगाने प्रसार, देशाची डोकेदुखी वाढणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -