भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्यांचे निधन झाले. सुषमा स्वराज या मागील काही काळापासून आजारी होत्या. त्यामुळेच २०१९मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र ‘मोदी सरकार-२’च्या शपथविधी समारंभात त्या सहभागी झाल्या होत्या. त्या प्रत्यक्ष राजकारणात नसल्या तरी सरकारच्या चांगल्या निर्णयांचे त्यांनी वेळोवेळी ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५-ए कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे त्यांनी ट्विटरवरून स्वागत केले होते. मंगळवारी रात्री आठ वाजता त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मी हाच दिवस पाहण्यासाठी जिवंत होते’, असे ट्विट त्यांनी केले. रात्री साधारणत: साडेनऊच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी हे तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
सुषमा स्वराज किंवा चिंकू स्वराज (पूर्वाश्रमीच्या शर्मा) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरयाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख स्वयंसेवक होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून येऊन भारतात स्थायिक झाले होते. स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले होते. संस्कृत व राज्यशास्त्र विषयातून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. स्वराज यांनी महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले होते. तेथूनच त्या राजकारणात आल्या. १९७७ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणार्या हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्यांनी १३ ऑक्टोबर १९९८ पासून ३ डिसेंबर १९९८ पर्यंत दिल्लीच्या ५ व्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्या दिल्ली राज्यातील दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ सालातील निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदिशा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या इ.स. २००० – २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री ही मंत्रिपदे सांभाळली. त्या डिसेंबर इ.स. २००९ ते मे २०१४ दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या होत्या.
२०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या दुसर्यांदा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून ४००,००० पेक्षा अधिक मतांच्या फरकाने जिंकून आल्या. २६ मे २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेटमध्ये ते परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या. अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वॉल स्ट्रीट जर्नल यांनी स्वराज यांचा भारताच्या ‘आवडत्या राजकारणी’ म्हणून गौरव केला होता.
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना ट्विटवर श्रद्धांजली वाहिली आहे…
A glorious chapter in Indian politics comes to an end. India grieves the demise of a remarkable leader who devoted her life to public service and bettering lives of the poor. Sushma Swaraj Ji was one of her kind, who was a source of inspiration for crores of people.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019
Deeply saddened, shocked at the sudden passing away of Sushma Swaraj Ji.I knew her since the 1990s.Even though our ideologies differed, we shared many cordial times in Parliament. An outstanding politician, leader, good human being.Will miss her.Condolences to her family/admirers
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 6, 2019
Deeply shocked and saddened to hear about Sushma Swaraj ji’s sudden demise.
A graceful and honest leader, a sensitive and selfless soul, a keen understanding of music and poetry and a dear friend. Our former external minister will be remembered fondly.— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) August 6, 2019
श्रीमती सुषमा स्वराज जी के दुखद निधन से मुझे गहरा आघात लगा है। उन्होंने हमेशा मुझे बड़ी बहन का स्नेह दिया और संगठनात्मक सलाह देकर राजनीतिक अभिभावक का फ़र्ज़ निभाया। भारतीय राजनीति में मज़बूत विपक्षी और पूर्व विदेश मंत्री के तौर पर उनकी भूमिका को सदैव स्मरण किया जाएगा।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 6, 2019
The demise of Sushma Swaraj ji is a huge loss to the nation. Her last 10 years, first as LoP and then as EAM were as inspirational as her rise in politics of the early days. The country has lost a statesman who went beyond political lines. (1/2)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 6, 2019