पणजी : येथे सुरू असलेल्या एससीओ (Shanghai Cooperation Organisation) बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर (Minister of External Affairs S Jaishankar) यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला (Pakistan) लक्ष्य केले. दहशतवादाचा कहर सुरूच आहे. पण दहशतवाद हा कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही आणि तो थांबलाच पाहिजे. मग तो सीमेपलीकडील दहशतवाद असो किंवा इतर सर्व प्रकारच्या दहशतवाद असो, असे आमचे ठाम मत आहे.
गोव्यातील पणजी येथे शुक्रवारपासून एससीओ परराष्ट्रमंत्र्यांची परिषद सुरू झाली आहे. या बैठकीचा मूळ उद्देश दहशतवादाचा मुकाबला करणे हा आहे. बैठकीपूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्वागत केले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारीही (Bilawal Bhutto Zardari) हे देखील यासाठी भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्यासमोरच जयशंकर यांनी सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
Hosted colleagues in Goa to the Meeting of SCO Council of Foreign Ministers.
Welcomed enthusiastic participation of all members in 100+ meetings. Particularly delighted that Varanasi hosted several events as the first SCO Cultural & Tourist Capital.
Noted that current crises… pic.twitter.com/pEPiJm7jgB
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 5, 2023
एससीओच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणावरही चर्चा झाली. इंग्रजी भाषा बोलणाऱ्या सदस्य राष्ट्रांमध्ये अधिक सखोल चर्चा करता यावी, यासाठी एससीओची तिसरी अधिकृत भाषा बनवावी, अशी मागणी भारत अनेक दिवसांपासून करत आहे. भारतानेही आपल्या मागणीसाठी सदस्य देशांकडून पाठिंबा देखील मागितला असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
जयशंकर आणि बिलावल आमने-सामने
एससीओ बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी गुरुवारी गोव्यात दाखल झाले. गुरुवारी संध्याकाळी सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जयशंकर आणि बिलावल भुत्तो हे देखील आमने-सामने आले, पण जयशंकर यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन न करता केवळ नमस्ते केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या. याव्यतिरिक्त त्यांच्यात संवाद झाला नाही, असे सांगण्यात येते.