घरताज्या घडामोडीनामिबियातून आणलेल्या चित्त्यांची संख्या वाढली, सियायाने दिला चार पिलांना जन्म

नामिबियातून आणलेल्या चित्त्यांची संख्या वाढली, सियायाने दिला चार पिलांना जन्म

Subscribe

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नामिबियातून आणलेल्या चित्त्यांची संख्या वाढली आहे. सिया या मादी चित्ताने चार पिल्लांना जन्म दिला आहे. तसेच मादी चित्ता आणि चार लहान पाहुणे सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. चित्ता संवर्धन प्रकल्पात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही ट्वीट करत आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

अमृत कालच्या काळात वन्यजीव संवर्धनाच्या इतिहासात एक महत्त्वाची आणि आनंदाची घटना घडली आहे. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला आहे, असं ट्विट भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आनंदाची बातमी असं म्हटलं आहे.

- Advertisement -

भारतातील वन्यजीव लोकसंख्येमध्ये चित्तांचा पुन्हा समावेश करण्यासाठी हे उद्यान योग्य अधिवास म्हणून तयार केले जात आहे. त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त, मोदींनी नामिबियामधून आणलेल्या आठ चित्त्या सोडल्या. ज्यामध्ये पाच नर आणि तीन मादी चित्ते आहेत. अलीकडेच एका मादी चित्ता साशाचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता. उद्यानात असलेल्या तिच्या कुंटणखान्यात ती मृतावस्थेत आढळली. तिची किडनी निकामी झाल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु मुत्रपिंडाच्या आजाराने साशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.


हेही वाचा : आमदार जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाच्या आत्महत्येने करमुसे प्रकरणाला नवे वळण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -