जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १३ हजार ९४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३६ जणांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर रिकव्हरी रेट ५८.२४ इतका झाला आहे.
The recovered cases have exceeded the active cases by 96,173. During the last 24 hours, a total of 13,940 #COVID19 patients have been cured, taking the cumulative figure to 2,85,636. This has led to the recovery rate touching 58.24 per cent: Govt of India
— ANI (@ANI) June 26, 2020
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी २४ तासांत कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. देशात मागील २४ तासांत १७ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ५८.३४ टक्के इतका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाने दिली आहे.
407 deaths and highest single-day spike of 17,296 new #COVID19 positive cases reported in India in the last 24 hours.
Positive cases in India stand at 4,90,401 including 1,89,463 active cases,2,85,637cured/discharged/migrated & 15301 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/g8EjQz2UwA
— ANI (@ANI) June 26, 2020
हेही वाचा – ‘हा’ SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकाम! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा