Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'हे' सत्तापक्षाचे बेगडी हिंदुत्व, हरियाणातील घडामोडींवरून ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

‘हे’ सत्तापक्षाचे बेगडी हिंदुत्व, हरियाणातील घडामोडींवरून ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

मुंबई : पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक आणि हरियाणासह काही राज्यांतील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपावाले ठिकठिकाणी धार्मिक हिंसेच्या ठिणग्या टाकण्याचे उद्योग करीत आहेत. जेमतेम चार आठवड्यांपूर्वीच ज्या शोभायात्रेने हरियाणातील नूंहमध्ये धार्मिक हिंसेचा वणवा पेटवला होता, ती शोभायात्रा पुन्हा त्याच ठिकाणी काढण्याचा हेकेखोरपणा याच उद्योगाचा भाग आहे. पुन्हा हे सर्व हिंदुत्वाच्या नावाने सुरू आहे. हे खरे हिंदुत्व नसून सत्तापक्षाचे बेगडी हिंदुत्व आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने भाजपावर सोडले आहे.

हेही वाचा – अयोध्या राम मंदिर उद्घाटनावेळी…, संजय राऊतांकडून भीती व्यक्त; ‘इंडिया’च्या बैठकीत करणार चर्चा

- Advertisement -

देशाच्या सीमेवरील मणिपूरसारखे संवेदनशील राज्य जातीय हिंसाचारात ज्यांनी तीन-चार महिने जळू दिले, ते आता राजधानी दिल्ली आणि पंजाबच्या सीमेवरील हरियाणा या राज्यांतही धार्मिक हिंसेची चूड लावण्याच्या प्रयत्नात आहेत. हरयाणामधील नूंह जिल्हा या महिन्याच्या सुरुवातीला ज्या ‘ब्रिजमंडल शोभायात्रे’मुळे जातीय वणव्यात होरपळून निघाला होता, त्याच नूंहमध्ये पुन्हा धार्मिक तणावाची ठिणगी टाकण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेतर्फे पुन्हा एकदा तेथे ‘ब्रिजमंडल शोभायात्रा’ काढण्याची घोषणा झाली आणि नूंह जिल्ह्याला लष्करी छावणीचे स्वरूप आले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हरियाणातील बनवाबनवी

नूंहमध्ये 10 ते 15 दिवस संचारबंदी, जमावबंदी केल्यावर परिस्थिती जेमतेम पूर्वपदावर आली होती. मात्र ही अपूर्ण राहिलेली ब्रिजमंडल शोभायात्रा 28 ऑगस्ट रोजी पूर्ण करणारच अशी घोषणा केली गेली आणि पुन्हा जातीय तणाव निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला. त्यावर हरियाणातील भाजपा सरकारने यात्रेला परवानगी नाकारल्याची मखलाशी केली, पण ते एक नाटकच होते. कारण ‘शोभायात्रेला परवानगी दिलेली नाही, मात्र यात्रेत सहभागी होण्याऐवजी लोक आपापल्या भागातील मंदिरांमध्ये जलाभिषेकासाठी जाऊ शकतात,’ असे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले. पुन्हा नलहड येथील मंदिरात जलाभिषेक करायला हरियाणा पोलिसांनीच परवानगी दिली. ही बनवाबनवी नाही तर काय आहे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणे अशक्य; छत्रपती संभाजीराजेंच्या दाव्यावर रोहित पवारांनी भाजपावर साधला निशाणा

दंग्यांमध्ये निरपराध्यांच्या रक्ताचे ‘अभिषेक’

श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर हिंदूंनी मंदिरांमध्ये जलाभिषेक जरूर करावा. त्याबद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही. किंबहुना कालपर्यंत हे सगळे होतच आले आहे. मात्र शांततेत होणारा हा विधी आज अचानक जातीय-धार्मिक सलोखा नष्ट करणारा, धार्मिक हिंसेला निमित्त का ठरत आहे? कारण त्या माध्यमातून हिंदू आणि इतर धर्मीयांच्या भावना भडकवायच्या, त्या दंग्यांमध्ये निरपराध्यांच्या रक्ताचे ‘अभिषेक’ होऊ द्यायचे आणि त्या आगीवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या, अशी कारस्थाने सुरू आहेत. राजकीय स्वार्थासाठी त्याचा आधार घेतला जात आहे. हिंदुत्वाच्या नावावर निरपराध्यांचे रक्त सांडले जात आहे. खऱ्या हिंदुत्वाला बदनाम करणारी हरियाणामधील पेटवापेटवी त्यासाठीच सुरू आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -