कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लस ही महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. जगभरात सर्वाधिक लसीकरण भारतात होत आहे. सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश भारत ठरला आहे. अमेरिकासारखा महासत्ता असलेल्या देशापेक्षा भारतात सर्वाधिक लसीकरण केले जात आहे. कोविड डॅशबोर्डनुसार, आतापर्यंत ३९ कोटी ३६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे. यादरम्यान केंद्राकडून लसीचे दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी किती प्रभावी आहे? याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नीति आयोगाच्या सदस्य डॉ. वीके पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना लसीचा पहिला डोस कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ८२ टक्के प्रभावी आहे. तर कोरोना लसीचे दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी ९५ टक्के यशस्वी आहे.’
One dose of vaccine was able to reduce the mortality rate by 82%. Two doses of vaccine were successful in preventing 95% of deaths due to COVID-19 during the second wave: Dr VK Paul, Member-Health, Niti Aayog pic.twitter.com/TLZye6RRvr
— ANI (@ANI) July 16, 2021
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १६ जुलैपर्यंत देशभरात ३९.५३ कोटी पार पडले आहे. आतापर्यंत १.७७ कोटी डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तर २.७९ कोटी डोस फ्रंटलाईन वर्कर्सना दिले गेले आहेत. तसेच २२.५४ कोटी डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले असून १८ ते ४४ वयोगटातील १२.४३ कोटी नागरिकांना लस दिली गेली आहे.
#COVID19Vaccination coverage (as on 16th July 2021)
▪️Healthcare workers- 1.77 crore doses
▪️Frontline workers- 2.79 crore doses
▪️People above 45 yrs- 22.54 crore doses
▪️People aged 18-44 yrs- 12.43 crore dosesTotal doses administered- 39.53 crore#LargestVaccineDrive pic.twitter.com/yrX6TPq5uS
— PIB India (@PIB_India) July 16, 2021
हेही वाचा – पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या धोकादायक व्हेरियंटवर भारताची ‘Warm Vaccine’ प्रभावी