घरअर्थजगतउद्या अर्थसंकल्पासोबत होणार हे '५' बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम

उद्या अर्थसंकल्पासोबत होणार हे ‘५’ बदल; सर्वसामान्यांवर होणार परिणाम

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2021 सादर करणार आहेत. याशिवाय १ फेब्रुवारीपासून बरेच मोठे बदल होणार आहेत जे सर्वसामान्यांशी संबंधित आहेत आणि त्याचा तुमच्यावरही परिणाम होऊ शकतो. बदल बँकिंगशी संबंधित आहे. याशिवाय, असे काही बदल आहेत ज्यांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल. १ फेब्रुवारीपासून काय बदलत आहे जाणून घ्या

अर्थसंकल्पात होऊ शकतात मोठे बदल

१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मली सीतारमण २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल की, पेपरलेस बजेट सादर केला जाईल. कोरोना संकटामुळे सरकारने पेपरलेस बजेट सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांपासून ते उद्योग जगतांपर्यंत सर्वांना या अर्थसंकल्पातून सवलतीची अपेक्षा आहे. आरोग्य, शेती आणि रोजगाराशी संबंधितही सरकार मोठ्या घोषणा करु शकते.

- Advertisement -

पीएनबी एटीएममधून पैसे काढण्यासाठी नियम बदलतील

सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक फसवणूक रोखण्यासाठी १ फेब्रुवारीला एक मोठे पाऊल उचलणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार १ फेब्रुवारीपासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. म्हणजेच उद्यापासून पीएनबी ग्राहक नॉन-ईएमव्ही नसलेल्या मशीनमधून पैसे काढू शकणार नाहीत.

एलपीजीच्या किंमती बदलणार

देशातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत कंपन्या उद्या किंमती वाढविण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असे झाल्यास सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसू शकेल. तथापि, ग्राहकांना किंमत कमी होण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

ट्रेनमध्ये ई-केटरिंग सुविधा १ फेब्रुवारीपासून सुरू

कोरोनामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये ई-केटरिंगची सुविधा मिळत नव्हती. परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने त्यानुसार रेल्वे सुविधा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसी १ फेब्रुवारीपासून ई-कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू करीत आहे. तथापि, सध्या ही सुविधा केवळ निवडक स्थानकांवर प्रवाशांना उपलब्ध होईल. त्याशिवाय रेल्वेने फेब्रुवारीपासून अनेक मार्गांवर गाड्या चालवण्याचा निर्णयही घेतला आहे. मुंबईतील सामान्य नागरिकांसाठी उपनगरी रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून पूर्ववत करण्यात येणार आहे.

अनेक मार्गांवर हवाई सेवा सुरू होणार

हवाई प्रवाश्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. एअर इंडिया आणि त्याची कमी किमतीची सहाय्यक कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसने नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे जाहीर केली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते २७ मार्च २०२१ दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज उड्डाणे सुरू करणार आहे.

याशिवाय राजा भोज विमानतळावरून इंडिगोची अहमदाबाद आणि लखनऊ उड्डाणे ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. ही दोन्ही उड्डाणे ७४ सीटरची आहेत. कोरोना विषाणूमुळे भारताने गेल्या वर्षी २३ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित केल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -