घरअर्थसंकल्प २०२२समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प; चंद्रशेखर बावनकुळे

समाजातील सर्व घटकांना बळ देणारा अर्थसंकल्प; चंद्रशेखर बावनकुळे

Subscribe

सप्तर्षी संकल्पनेत मांडल्याप्रमाणे समावेशी विकास, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, युवा शक्तीचा विकास, आर्थिक क्षेत्राचा विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन आगामी २५ वर्षात भारताला विकसित देश बनविण्यासाठी आवश्यक उपाय यात करण्यात आले आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

Union Budget 2023 : नवी दिल्ली –  शेतकरी, युवक, उद्योजक, गरीब, मध्यमवर्गीय, महिला अशा सर्व समाजघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकणारा अर्थसंकल्प सादर झाला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मोदी यांचा सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेणारा आणि भारताला विकसित देश करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे कौतुक बावनकुळे यांनी अर्थसंकल्पाचे केले.

- Advertisement -

ते म्हणाले की, मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा अंत्योदयाच्या संकल्पनेनुसार समाजातील शेवटच्या माणसाची काळजी घेणारा आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देऊन सक्षम करणारा आहे. मध्यमवर्गीयांच्या आकांक्षाची दखल घेण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि उद्योगांना चालना देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी उपाय करणारा हा अर्थसंकल्प आहे.

सप्तर्षी संकल्पनेत मांडल्याप्रमाणे सर्वसमावेशी विकास, पायाभूत सुविधा व गुंतवणूक, युवा शक्तीचा विकास, आर्थिक क्षेत्राचा विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सामान्य माणसाला सोबत घेऊन आगामी २५ वर्षात भारताला विकसित देश बनविण्यासाठी आवश्यक उपाय अर्थसंकल्पात करण्यात आले आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांनी २०१६ -१७ पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला पैसा हा खर्च समजण्याची अर्थसंकल्पातील तरतूद महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांना आयकराच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. सहकार क्षेत्राला मदत करणाऱ्या या तरतुदीसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांचे आभार मानायला हवेत. प्राथमिक कृषी सोसायट्यांना अधिक सवलती देण्याचा निर्णयही महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्वजन हिताय या संकल्पनेवर आधारीत अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. समाजातील शेवटच्या व्यक्तिचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजनक व युवा, अशा सर्वच स्तरांचा विचार करुन हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. सर्वांनाच अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -