कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. यावर प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, लंडनमधून एक प्रतिक्रिया आली आहे. या घोषणेबद्दल मद्य उद्योजक विजय मल्ल्या यांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केलं. तसंच आता सरकारने माझ्याकडूनबी सर्व पैसे परत घ्यावेत, असं मल्ल्या म्हणाला. विजय मल्ल्याने ट्विट करत विनवणी केली आहे.
“कोविड-१९ मदत पॅकेजबद्दल सरकारचे अभिनंदन. ते पाहिजे तितके पैसे मुद्रित करू शकतात, परंतु त्यांनी माझ्यासारख्या छोटंस सहकार्य करणाऱ्या व्यक्तीकडे जो राज्य मालकीच्या बँक कर्जाचे १०० टक्के पैसे परत करायचे आहेत त्याच्याकडे सतत दुर्लक्ष का केलं जात आहे?, ज्याला स्टेट बँकेचे सर्व करायचे आहेत. माझ्याकडून सर्व पैसे बिनशर्त घ्या आणि प्रकरण संपवा,” असं ट्विट मल्ल्याने केलं आहे.
Congratulations to the Government for a Covid 19 relief package. They can print as much currency as they want BUT should a small contributor like me who offers 100% payback of State owned Bank loans be constantly ignored ? Please take my money unconditionally and close.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 14, 2020
हेही वाचा – ५ लाख मास्क, ९५० पीपीई किटची तस्करी; सर्व सामान चीनला पाठवण्याचा डाव
मद्य उद्योजक विजय मल्ल्याला भारतात फरार म्हणून घोषित केलं गेलं आहे. त्याच्यावर सुमारे ९००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. विजय मल्ल्या बर्याच दिवसांपासून लंडनमध्ये आहे. दरम्यान, लंडनच्या न्यायालयाने विजय मल्ल्याला भारतात प्रत्यार्पणासाठी आदेश दिले होते, ज्यांच्या विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी विजय मल्ल्याला एकदा ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र तो जामिनावर आहे.