देशासह जगभरात होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांकडून होळीनिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यात भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने देखील ट्विट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छांमुळे त्याला खूप ट्रोल केलं जात आहे. विजय मल्ल्याने ट्विटरवर ‘हॅप्पी होली’ असं ट्विट केलं आहे. मात्र या ट्विटवर आता युजर्सकडून ‘बँक फसवणुकीचे पैसे परत कर’ अशा कमेंट्स केल्या जात आहे. विजय मल्ल्याविरोधात भारतात 9000 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र घोटाळा उघडकीस आल्यानंतर मल्ल्या भारतातून लंडनला पळून गेला.
Happy Holi to all.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 17, 2022
विजय मल्ल्याने गुरुवारी रात्री एक ट्विट करत लिहिले की- “सर्वांना होळीच्या शुभेच्छा”. त्यानंतर लगेचच ट्विटर युजर्सनी मल्ल्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कुणी लिहिलं की, आधी पैसे परत कर, तर कुणी म्हटलं की, रंग लावूनच भारतात परत ये. युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये मल्ल्यावर अनेक मजेदार मीम्सही शेअर करत आहेत.
— Feel Hapi official 🌈 (@FeelHapi) March 17, 2022
Meanwhile SBI
It’s a bank holiday!! pic.twitter.com/OXFc5fn2rE
— Trupti Garg (@garg_trupti) March 17, 2022
Meanwhile #SBI https://t.co/oaoqm12bkq pic.twitter.com/L4CmodBb4l
— VJ🇮🇳 (@WaitingforIPL) March 17, 2022
नुकतेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्तांमधून बँकांनी 18000 कोटी रुपये वसूल केले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय ईडीने पीएमएलए अंतर्गत न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार बँक डिफॉल्ट प्रकरणात ही रक्कम जप्त केली. या फरार व्यावसायिकांकडून घोटाळ्याची संपूर्ण रक्कम लवकरात लवकर वसूल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.