घरताज्या घडामोडीझारखंडमध्ये पुन्हा हिंसाचार, हल्लेखोरांकडून दगडफेक आणि जाळपोळ

झारखंडमध्ये पुन्हा हिंसाचार, हल्लेखोरांकडून दगडफेक आणि जाळपोळ

Subscribe

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक ध्वजाची कथित विटंबना झाल्यानंतर शास्त्रीनगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली. हल्लेखोरांनी दगडफेक करत अनेक दुकानं आणि एक ऑटो रिक्षा पेटवून दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काल रविवारी सायंकाळी संपूर्ण परिसरात संचाबंदी लागू केली आहे. दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोबाइल इंटरनेट अंशत: बंद करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच एकत्र जमलेल्या नागरिकांना घरी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

पूर्व सिंघभूम जिल्ह्याच्या उपायुक्त विजया जाधव यांनी सांगितले की, काही समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य करावे. स्थानिक संघटनेच्या सदस्यांना रामनवमीच्या ध्वजाची विटंबना केल्याचे समजताच शनिवारी रात्रीपासून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

याप्रकरणी दोन्ही समाजातील एकूण 55 जणांना अटक करण्यात आली आहे. अभय सिंगच्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात येऊन अश्लील कृत्य केले आहे. या सर्वांवरही कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर दोन समुदायांमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर जमशेदपूर प्रशासन ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवत आहे.

- Advertisement -

31 मार्चलाही झाला होता हिंसाचार

जमशेदपूरमधील हल्दीपोखरमध्ये 31 मार्चच्या रात्री रामनवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. लोक रामनवमीची मिरवणूक काढत होते. मिरवणूक जुगसलाई येथे पोहोचताच काही आंदोलकांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. या घटनेने संतप्त झालेल्या लोकांनी बाटा चौकात हनुमान चालिसाचे पठण सुरू केले.


हेही वाचा : मुलाला किस केल्याच्या वादावर दलाई लामांनी मागितली माफी; म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -