घरताज्या घडामोडीभाजप हा कुटुंबाधिष्ठीत पक्ष नाही - पंतप्रधान मोदी

भाजप हा कुटुंबाधिष्ठीत पक्ष नाही – पंतप्रधान मोदी

Subscribe

भारतीय जनता पक्ष हा कुटुंबाधिष्ठीत पक्ष नसून मूल्य आणि परंपरा सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाच्या मनाच्या विश्वासाचा सेतू बनले पाहिजे. आज केंद्रात भाजपने जे स्थान मिळवले आहे त्याचे कारण भाजप हा सर्वसामान्यांशी जोडला गेलेला पक्ष आहे. भाजप जपत असलेल्या मूल्यांमध्ये सेवा, संकल्प आणि समर्पणाचा समावेश आहे. ही पार्टीची परंपरा आहे. परंपरेला पुढे नेत आणि कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आपण पुढे चाललो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भाजपच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने झाली. तसेच, आगामी काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेतून या बैठकीबाबत माहिती दिली.

- Advertisement -

भूपेंद्र यादव म्हणाले की, रविवारी सकाळपासून कार्यकारिणीची बैठक सुरू होती. बैठकीच्या पहिल्या सत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण झाले. तर, बैठकीच्या दुसर्‍या सत्रात गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्याचे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांद्वारे आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण विषय मांडण्यात आला. राज्य सरकारकडून पाच वर्षांमध्ये जे काम करण्यात आले त्याचा मुख्यमंत्र्यांनी लेखाजोखा मांडला. याचबरोबर जनेतशी जुडण्यासाठी त्यांच्यात विविध विषय नेण्यासाठी, विविध वर्गांसोबत समन्वय साधण्यासाठी पार्टीकडून ज्या विविध योजना आखण्यात आल्या आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती तेथील प्रदेशाध्यक्षांनी दिली. या चार राज्यांशिवाय पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांनी आगामी काळात भाजपा तयारीनिशी सर्व जागांवर निवडणूक लढवावी असे सांगितले गेले.

या कार्यकारिणी बैठकीचे सांगता, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने झाली. पंतप्रधान मोदींनी आगामी काळात भाजपची कार्यनिती बनवण्यासाठी एक मोठा मंत्र सर्व कार्यकर्त्यांना दिला. मोदी म्हणाले की, आगामी काळात भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना या विश्वासाला घेऊन वाटचाल करावी लागेल. कोविड काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात केवळ राजकारण नाही, तर ‘सेवा परमो: धर्म’ या तत्वानुसार काम केले. भाजप सातत्याने हा आदर्श विचार घेऊन पुढे चालली आहे. भाजपने लोकशाही व्यवस्था मजबूत केली आहे. पंतप्रधान मोदींनी आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त कार्यकर्त्यांना उत्साहाने पक्षाचे काम पुढे नेण्याचे आवाहन केले, अशीही माहिती भूपेंद्र यादव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -