मागील तीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं होतं. देशातील अनेक राज्यांत कोरोना विषाणूने हातपाय पसरले होते. मात्र, कोरोनाची लाट संपल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी सांगितले की, काल आपत्कालीन समितीची १५वी बैठक झाली. यामध्ये कोविड-१९ ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. तसेच ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.
३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड संदर्भात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरीही कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं.
“For the past year, the Emergency Committee – and WHO – have been analysing the data carefully and considering when the time would be right to lower the level of alarm”-@DrTedros #COVID19 https://t.co/pwBLVl37nh
— World Health Organization (WHO) (@WHO) May 5, 2023
जेव्हा कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती. तेव्हा चीनमध्ये १०० पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यावेळी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र, तीन वर्षांनंतर हा आकडा ७० लाखांच्या वर पोहोचला आणि सुमारे २० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला, असंही डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे.