भारतात करोनाग्रस्तांची संख्या १०१ वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी भारतात अनेक राज्यात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. WHO ने अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताचं कौतूक केलं आहे. देशातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषीत केला आहे. त्यामुळे WHO ने भारताचं कौतूक केलं आहे. अशाप्रकारची पाऊलं भारताने कायम उचलली पाहिजेत असं WHO ने सुचवलं आहे.
India led the world in eradicating two silent killers – Small Pox and Polio. India has tremendous capacities, all countries have tremendous capacities when communities and civil societies are mobilized: WHO Executive Director Dr Michael J Ryan #Coronavirus https://t.co/3yyDh7CBbB
— ANI (@ANI) March 23, 2020
WHO चे संचालक रेयॉन यांनी भारताचे कौतूक केले आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. भारताने करोनाच्या संकटाशी दोन हात करायला आक्रमक निर्णय घेतले. त्यांनी घेतलेल निर्णय हे योग्यच आहेत. त्यामुळे लोकांचे आरोग्य जपायला फायदाच झाला. भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे. ”
भारतात सध्या करोनाग्रस्तांची संख्या ५००च्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात १०१ रूग्ण करोनाग्रस्त आहेत. सरकार लोकांची सर्वोतोपरी काळजी घेताना दिसत आहे. महाराष्ट्रात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.