देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक २८ हजार ६३७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ४९ हजार ५५३ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार ६७४ झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
With highest single-day spike of 28,637 cases, India’s COVID-19 tally reaches 8,49,553
Read @ANI Story | https://t.co/ee7gvDFTQ5 pic.twitter.com/vvsyfAfdkg
— ANI Digital (@ani_digital) July 12, 2020
At least 18 people tested #COVID19 positive at Raj Bhavan (Governor’s residence) in Mumbai, after they got themselves tested on their own. Brihanmumbai Municipal Corporation (BMC) to get them tested again: BMC Sources
— ANI (@ANI) July 12, 2020
राज्यात सर्वाधिक ८१३९ रुग्ण आढळले
राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सलग दोन दिवस कोरोनाबाधित रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. त्यातच शनिवारी कोरोना बळींनी १० हजारांचा टप्पा ओलांडला. राज्यात ८१३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजार ६०० झाली आहे. तर राज्यात ९९ हजार २०२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात २२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
हेही वाचा – ना रुग्णवाहिका, ना बंद गाडी, थेट रिक्षातून आणला कोरोनाबाधिताचा मृतदेह!