घरताज्या घडामोडी'सीएएबद्दल तरुणांमध्ये अफवा पसरवून दिशाभूल केली जातेय'

‘सीएएबद्दल तरुणांमध्ये अफवा पसरवून दिशाभूल केली जातेय’

Subscribe

हा कायदा नागरिकत्व देणार आहे, हिसकावून घेणारा नाही, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकत्ता मधील बेलूर मठ येथे भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. या कायद्याबद्दल तरुणांमध्ये अफवा पसरवून दिशाभूल केली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

तरुणांमध्ये या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहे. सीएएबाबत तरुणांच्या मनात शंका निर्माण केल्या जात असून अनेक तरुण यासंबंधीच्या अफवांना बळी पडत आहेत. या तरुणांना समजावून सांगणं आपलं कर्तव्य असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसंच ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान वगळता दुसऱ्या देशातला कुणीही नागरिकत्व घेऊ शकतं नाही हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा कायदा नागरिकत्व देणार आहे, हिसकावून घेणारा नाही. हा कायदा एका रात्रीत तयार केला नसून विचारपूर्वक रित्या केला आहे. पण काही राजकीय पक्ष समजून घेत नाही आहे. तसंच अल्पसंख्याकांवर हा कायदा लागू झाल्यानंतर का अत्याचार केले, याचं उत्तर पाकिस्तानला द्यावं लागेल.

- Advertisement -

‘सध्याच्या नागरिकत्व कायद्यात केवळ दुरुस्ती केली आहे. ज्या नागरिकांना फाळणी झाल्यामुळे अनेक अडचणींचा, अत्याचाराचा सामना करावा लागला, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे असं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना वाटतं होत.’ ‘जे गांधीजींनी सांगितलं त्याचं आम्ही पालन केलं’, मोदींनी असं सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – अनुराग कश्यपचे मोदींना आव्हान; शिक्षणं घेतलंय हे सिद्ध करा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -