घरसंपादकीयदिन विशेषथोर क्रांतिकारक मादाम भिकाई कामा

थोर क्रांतिकारक मादाम भिकाई कामा

Subscribe

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. त्यांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले.

मादाम भिकाई रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या. त्यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रुस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. त्यांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषकरून देशभक्तीपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. सावरकरांचे ‘१८५७ चा स्वांतत्र्य लढा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी सावरकरांना मदत केली. त्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत.

- Advertisement -

१९०७ मध्ये जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो, पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले.

झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. ‘वन्दे मातरम’ हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंड्याच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लीम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. त्यांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि त्यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. अशा या महान क्रांतिकारीकेचे १९ ऑगस्ट १९३६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -