घरसंपादकीयदिन विशेषथोर समाजसुधारक स्वामी रामानंद तीर्थ

थोर समाजसुधारक स्वामी रामानंद तीर्थ

Subscribe

स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९०३ रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे झाला. जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून त्यांना छड्या खाव्या लागल्या, पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही. त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले.

तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय सहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यामुळे आपसुकच ते गिरणी कामगारांच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाले. तत्पूर्वी लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते अतीव दुःखी झाले. त्यांनी त्या वेळी ‘या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले.

- Advertisement -

१४ जानेवारी १९३२ रोजी उस्मानाबादमधील हिप्परगा येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्यांनी हिप्परगा येथे तत्पूर्वीच १९३० मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली. याच काळात आ. कृ. वाघमारे आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या जुलूमजबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली. १९३१ मध्ये केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांच्या प्रेरणेने आर्य समाजाची स्थापना केली. अशा या थोर समाजसुधारकाचे २ जानेवारी १९७२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -