घरताज्या घडामोडी20 Years Of Lagaan: पहिल्या पत्नीचे ते पत्र वाचून आमिर खान ढसाढसा...

20 Years Of Lagaan: पहिल्या पत्नीचे ते पत्र वाचून आमिर खान ढसाढसा रडला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan)च्या निर्मितीत तयार झालेला पहिला वहिला चित्रपट म्हणजे ‘लगान'(Lagaan). आज ‘लगान’ चित्रपटाला तब्बल २० वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटामुळे आमिर खानला एक परफेक्शनिस्ट अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळाली होती. आमिरच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाला खूप यश मिळाले. तसेच दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर (Ashutosh Gowariker) आणि आमिरच्या या चित्रपटला ऑस्करचे ‘बेस्‍ट फॉरेन लेंग्‍वेज फिल्‍म’चे नोमिनेशन मिळाले होते. आमिरसाठी हा चित्रपट अनेक गोष्टींसाठी खास होता. कारण या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमिरची दुसरी पत्नी किरण राव (Kiran Rao) यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. यामुळे आमिरच्या या दुसऱ्या लग्नाला देखील २० वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु आमिरच्या मते या चित्रपटासंबंधित सर्वात सुंदर आठवण त्याची पहिली पत्नी रीना दत्ता आहे आणि तिने लिहिलेले पत्र.

‘लगान’ चित्रपटाला २० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आमिर खानने माध्यमांशी खास बातचित केली. यादरम्यान आमिर सांगितले की, ‘या चित्रपटासंबंधित आठवणींबद्दल बोलायचे झाले तर माझ्यासाठी असंख्य आहेत. परंतु माझ्यासाठी सर्वात खास आठवण म्हणजे रीना. माझी पहिली पत्नी. मी तिला एका रात्रीत हा चित्रपट निर्मित करण्यास सांगितले होते. पण तिने सांगितले की, तिला चित्रपट निर्मितीबद्दल काहीच माहिती नव्हते. आणि हे खरेच होत, तिला काही माहित नव्हते. पण तरीही रीना निर्माती बनली. चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी रीनाने यासाठी खूप चांगली तयारी केली. ती सुभाष घईंना भेटली, अशोक ठकरियाला भेटली आणि चित्रपट निर्मिती समजण्याचा प्रयत्न केला.’

- Advertisement -

या आठवणीबद्दल पुढे आमिरने सांगितले की, ‘तिने खूप कमी वेळात चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक गोष्टी शिकल्या, हे खूप कौस्तुकास्पद आहे. मला आठवतंय ती खूप कडक शिस्तीची निर्माती होती, सर्वांना ओरडत असे. मलाही ती ओरडत असायची. म्हणजे विचार करा, जी नवीन मुलगी आताच निर्मिताची झाली आहे, ती आशुतोषसह माझ्यापासून सर्वांना ओरडत असायची. परंतु जेव्हा चित्रपट पूर्ण झाला तेव्हा रीनाने सर्व टीमला एक पत्र लिहिले होते आणि ते वाचून खूप रडलो. आता मला पूर्ण पत्र आठवत नाही. परंतु तिने कठीण परिस्थितीत चित्रपट तयार करण्यासाठी सर्वांचे आभार मानले होते आणि ओरडत असल्याची गोष्ट देखील तिने नमूद केली होती. ते पत्र खूप भावूक करणारे होते. आम्ही सर्वजण चित्रपटचा बॅकग्राउंड असलेले होतो, पण तिचा चित्रपटसंबंधित कोणताही बॅकग्राउंड नसूनही तिने कमाल काम केले होते.
आमिर खानच्या निर्मितीच्या या पहिला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान आणि किरण राव एकमेकांच्या जवळ आले आणि आमिरने रीनाला तलाक देऊन किरण रावशी लग्न केले.

- Advertisement -

हेही वाचा – sushant singh rajput death anniversary: युरोपच्या ट्रिपमध्ये असे काय झाले होते? ज्यानंतर बदलला सुशांत


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -