यंदाचे २०२१ हे वर्ष सरुन नव्या वर्षाचे आगमनाला काहीच दिवस उरले आहेत. गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. या २०२१ मध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मकही गोष्टी घडल्या आहेत. याशिवाय अनेक वादग्रस्त गोष्टी उघडकीस आल्या आहेत. राजकीय क्षेत्रापासून ते बॉलीवूड चित्रपटसृष्टीचीही यातून सुटका झालेली नाही. यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक धक्के सहन करावे लागले आहे. अनेक सेलिब्रिटी २०२१ मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, काहींना जेलची हवा खावी लागली, तर काही सेलिब्रिटी हे चर्चेत होते.
राज कुंद्राला पॉनोग्राफीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.त्याच्यामुळे शिल्पा शेट्टीही निशाण्यावर होती मात्र, पोलिस तपासात अभिनेत्रीला क्लीनचिट देण्यात आली.
तसेच, बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत होता. २ ऑक्टोबरला एनसीबीने आर्यन खानला गोव्याला जाणाऱ्या क्रूज शिपमध्ये पकडून अटक करण्यात आली होती.
आर्यन खान ड्रग्स केसमध्ये त्याची मैत्रीण असल्यामुळे अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीच्या ऑफीसमध्ये हजेरी लावावी लागली.
अभिनेत्री करीना कपूरने आपला मुलगा जेह याचे नाव जहांगीर असल्याचे सांगितल्यावर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले.
अभिनेता कार्तिक आर्यनला करण जौहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटाची ५० टक्के शूटिंग झाल्यावर चित्रपटातून बाहेर काढले.
मार्च २०२१ मध्ये अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकली.
अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन २’ सीरीजवर तमिळांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करण्यात आला.
अली अब्बास जफर दिग्दर्शीत तांडव ही वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. सीरीजमध्ये भगवान शिव यांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता.
अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
हेही वाचा – Controversial Web Series 2021: तांडवपासून पाताल लोकपर्यंत २०२१च्या वादग्रस्त वेब सीरीज