घरमनोरंजनकारभारी लयभारीमधील राजवीर आणि प्रियांकाचा विवाह सोहळा

कारभारी लयभारीमधील राजवीर आणि प्रियांकाचा विवाह सोहळा

Subscribe

'कारभारी लयभारी' मध्ये १ मार्च ते ८ मार्च या दिवसांत विशेष विवाह सोहळा सप्ताह पार पडणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ अल्पावधीतच प्रेक्षकांना भुरळ पाडणारी मालिका ठरली आहे. ही मालिका एका युवा राजकारणी राजवीरच्या जीवनावर आधारित आहे. त्यातील प्रियंका आणि राजवीरची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडली आहे. त्यांची जोडी विरू आणि पियू या नावांनी प्रसिद्ध आहे. आता या मालिकेमध्ये प्रेक्षकांना विवाह सोहोळ्याची जल्लत तयारी सुरू आहे. विरू आणि पियूचा विवाह सोहळा पार पडणार आहे. ‘कारभारी लयभारी’ मध्ये १ मार्च ते ८ मार्च या दिवसांत विशेष विवाह सोहळा सप्ताह पार पडणार आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


प्रियंका आणि राजवीरच्या लग्नाची लगेधूम सुरु आहे. मात्र या लग्नाला कुटूंबाचा विरोध आहे. कुटूंबाचा विरोध पत्करुन प्रियंका राजवीरसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. लग्नापूर्वीच्या मंगलकार्याला सुरुवात झाली आहे. हा विवाहसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडतो की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रियंका आणि राजवीरचा लग्न सोहळा अंकुशरावांना समजू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. मंडपाच्या आजूबाजूला मुलांचा कडक पहारा ठेवला आहे. मात्र अंकुशराव पाटील यांना हे लग्न मान्य नसल्यामुळे ते या मंगलकार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं पाहायला मिळत आहे. नक्की हा विवाहसोहळा कसा पार पडेल ते १ मार्च ते ८ मार्च या मालिकेच्या विशेष सप्ताहात समजणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -


हेही वाचा – संजय राठोडांचा राजीनामा आला नाही, तर भाजपचे आमदार राजीनामे देणार – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -