Aishwarya Rai Bachchan Trolled : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रवारी रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर प्रत्येक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सोशल मीडियावर लता दीदींचा फोटो शेअर त्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु लता दीदींना श्रद्धांजली वाहताच ऐश्वर्या रायला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याचे नेमके कारण काय आहे? जाणून घ्या.
ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, ‘तुम्ही गेल्याचे दुख: व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुमच्या आत्म्यास शांती मिळो हीच आमची प्रार्थना. गॉड ब्लेस. तुम्ही आम्हाला दिलेल्या आशिर्वादासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत’. ऐश्वर्याने या पोस्टमधून लता दीदींविषयी तिच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
लता दीदींचे निधन होऊन दोन दिवस झाले. अनेक दिग्गज तसेच नव्या कलाकारांनी लता दीदींना ६ फेब्रुवारीलाच श्रद्धांजली वाहिली. ऐश्वर्याने मात्र दोन दिवसांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिल्याने तिला ट्रोल करण्यात आले आहे. देशातील भारतरत्न महान व्यक्तीच्या निधनाचा शोक ऐश्वर्याने दोन दिवसांनी व्यक्त केल्याने चाहते तिच्यावर नाराज झाले असून ऐश्वर्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
एका युझरने लिहिले आहे की, खूप लवकर आठवण आली तुला? तर दुसऱ्या युझरने, तुला आता आठवण कशी आली? असे म्हणत रागाचे इमोजी कमेंटमध्ये शेअर केले आहे.
ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते परंतु महत्त्वाच्या व्यक्तींचा वाढदिवस, अँनिव्हर्सरीच्या स्पेशल पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. लता दीदींच्या जाण्याने ऐश्वर्याने त्यांना उशिरा श्रद्धांजली वाहिल्याने तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.
ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर, ऐश्वर्या सध्या ‘पोन्नियन सेलवन’ या साउथ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यक्त आहे. या सिनेमात ती डबल रोल करत आहे.
हेही वाचा – Jhund Teaser launch : बिग बींच्या ‘झुंड’ सिनेमाचा टीझर आऊट ; यंगस्टर्ससोबत…