घरमनोरंजनकोरोनातून बरे झाल्यानंतर आलिया-रणवीर निघाले फिरायला..

कोरोनातून बरे झाल्यानंतर आलिया-रणवीर निघाले फिरायला..

Subscribe

कोरोनातून दोघेही बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांना एकत्र पाहायला मिळाले आहे.

बॉलिवूड कपल आलियाभट्ट आणि रणवीर कपूर यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. दोघेही आपापल्या घरी क्वारंटाईन होते. मात्र आता त्यांच्या विलगी करणाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आलिया आणि रणवीर दोघेही फिरायला चालले आहेत. आज सकाळी दोघांनाही विमानतळावर पाहण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपे मालदिवला जात आहेत. कोरोनातून दोघेही बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच दोघांना एकत्र पाहायला मिळाले आहे. गेल्या महिन्यात आलियाने तिचा कोरोनाचा अहवाल नेगेटिव्ह आल्याची माहिती शेअर केली होती. त्यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने असे लिहिले होते की, आत्ताचचा काळ आहे ज्यात निगेटिव्ह असण चांगली गोष्ट आहे.” अशी पोस्ट शेअर करत तिने तिचा आनंद व्यक्त केला होता. सोबतच याच आठवड्यात रणवीरही क्लिनिकमधून बाहेर पडताना स्पॉट केले होते. नुकताच कोवड १९ मधून बरा झालेला रणवीर कॅमेरासाठी सुरक्षित अंतर देवून पोजही करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

 आलिया आणि रणवीर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहे. ते दोघेही सोशल मीडियाद्वारे त्यांचे रोमॅन्टिक फोटो त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आता ही जोडी लवकरच एका नव्या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ब्रम्हास्त्र असून अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आलिया आणि रणवीर सोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन , नागार्जुन आणि मोनी रॉय हे कलाकारही दिसणार आहेत.

- Advertisement -

हे वाचा-  केतकी आणि ऋषिकेश म्हणताहेत ‘पाहिले मी तुला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -