Alia Bhatt : बॉलिवूडचे सध्याचे चर्चेतील कपल म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ब्रम्हास्त्र सिनेमाच्या सेटवर आलिया रणबीर प्रेमात पडले असे म्हटले जात आहे. तर अलिया सध्या गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया प्रमोशन दौऱ्यावर असताना एका मुलाखतीत आलियाने तिच्या आणि रणबीरच्या लग्नाविषयी भाष्य केले आहे. लॉकडाऊन नसता तर आता आम्ही नवरा बायको असतो अशी प्रतिक्रिया रणबीरने काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र यावेळी आलियाने थेट त्यांच्या लग्नाचा दिवस सांगितला आहे.
आलियाच्या सिनेमांपेक्षा आलिया लग्न कधी करणार असे प्रश्न तुला सारखे विचारले जातात असे विचारल्यानंतर त्यावर आलिया म्हणाली, मागच्या काही दिवस बॉलिवूडचे अनेक कपल्स लग्न करत आहेत. त्यामुळेच त्यांना आमचे लग्न कधी होणार याविषयी उत्सुकता आहे. परंतु मला नेहमी वाटते की, लग्नचा निर्णय हा माझ्या भावनांशी जोडलेला आहे. मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मी यासगळ्यासाठी तयार असेन आणि कम्फर्टेबल असेन. हा नियम रणवीरलाही लागू होत असल्याने रणबीर आणि मी त्याच दिवशी लग्न करू जेव्हा आमच्या भावना एक असतील आणि आम्ही लग्न करण्यासाठी तयार असू.
आलिया पुढे म्हणाली, आम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर मी मनाने कधीच रणबीरशी लग्न केले आहे. त्यामुळे आता आम्ही लग्न कधी करणार या प्रश्नाने मला फारसा फरक पडत नाही. मी जेव्हा पहिल्यांदा रणबीरला ऑनस्क्रिन पाहिले होते तेव्हाच मी ठरवले होते लग्न करेन तर रणबीरशीच पण तेव्हा मी फार क्यूट लहान मुलगी होती.
रणबीर माझ्या आयुष्यात आलेला सर्वात चांगली व्यक्ती आहे. ज्या प्रकारे मी त्याचा आदर करते, माझ्या मनात त्याच्या विषयी प्रेम आहे त्याचप्रमाणे तो देखील मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. सर्व गोष्टी योग्य वेळी आली होतात. आता आम्ही लग्न कधी करू हे सांगणे थोडे घाईते होईल पण आम्ही जेव्हा लग्न करू तेव्हा सर्वांना समजेल, असे आलिया म्हणाली.
हेही वाचा – Farhan Shibani Wedding : लग्नानंतर शिबानीने बदलले नाव, आता शिबानी दांडेकर नाही…