घरमनोरंजन'मनात आलं तर आताही लग्न करेन' - आलिया भट

‘मनात आलं तर आताही लग्न करेन’ – आलिया भट

Subscribe

अनुष्का – विराट, सोनम – आनंद, नेहा – अंगद या जोड्यांनी लागोपाठ लग्न करून सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा एक प्रकारे ट्रेंडच आणला आहे. या सगळ्या अभिनेत्रींमध्ये आलियानं असं आपलं एक वेगळं नाव कमावलं असून ती फक्त २५ वर्षांची आहे. गेल्याच आठवड्यात रणबीर कपूरनं आलियाला डेट करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर आता लवकरच लग्नबेडीत अडकणार का? या चर्चांना उधाण आलंय.

‘लिव्ह-इनमध्ये कधीही राहणार नाही’

आपल्या वयाची २५ वर्ष पूर्ण झाली असून लग्नाचा काही विचार आहे का? या प्रश्नावर ‘सध्या तरी मी लग्नाचा विचार करत नाही. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मी जास्त विचार करत नाही. मला जे वाटतं ते मी करते. आयुष्यात योजना आखत मी काहीही करत नाही. जेव्हा तुम्ही कमी अपेक्षा ठेवता तेव्हाच तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतात असं मला वाटतं.’ असं आलियानं हसत सांगितलं. ‘मनात येईल तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम आहे, आपण आताच लग्न करू. पण मी लिव्ह-इनमध्ये नाही राहणार. लग्न करूनच तुझ्याबरोबर राहीन. असं सांगून लगेच लग्न करेन.’ असं यावेळी आलिया म्हणाली.

- Advertisement -

यशस्वी अभिनेत्री

आलियानं अतिशय कमी वेळात स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावलं आहे. आतापर्यंत काम केलेल्या चित्रपटांमध्ये तिचा १०० टक्के यशस्वी चित्रपटांचा रेकॉर्ड आहे. मागच्याच महिन्यात ‘राझी’नं बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. सध्या आलिया ही अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’मध्ये व्यस्त आहे आणि त्याच सेटवर आलियाची जवळीक वाढल्याच्या चर्चांना हवा मिळाली होती. यानं असं आपलं एक वेगळं नाव कमावलं असून ती फक्त २५ वर्षांची आहे. गेल्याच आठवड्यात रणबीर कपूरनं आलियाला डेट करत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर आता लवकरच लग्नबेडीत अडकणार का? या चर्चांना उधाण आलंय.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -