घरमनोरंजनअमिताभ बच्चन यांनी फेडले उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

अमिताभ बच्चन यांनी फेडले उत्तर प्रदेशातील १३९८ शेतकऱ्यांचे कर्ज

Subscribe

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विदर्भातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विदर्भातील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे ४.०५ कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. याबाबतची माहिती, त्यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे. शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) प्रमाणपत्र मिळाले आहे. सर्व शेतकऱ्यांना मुंबईला आणणे शक्य नाही. त्यासाठी ७० शेतकऱ्यांना मुंबईला आणण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.

वाचा : महानायक अमिताभ यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू

- Advertisement -

काय म्हणतात बिग बी

उत्तर प्रदेशमधील ज्या १३९८ शेतकऱ्यांचे बँक कर्ज फेडण्याचा विचार केला होता. तो पूर्ण केला आहे. बँकांनी त्यांच्या नावाने ओटीएस प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा मला खूप आनंद झाला आहे. या शेतकऱ्यांना स्वहस्ते ओटीएस प्रमाणपत्र देण्याची माझी इच्छा आहे. पण इतक्या शेतकऱ्यांना मुंबईत बोलवणे शक्य नाही. त्यामुळे त्यातील ७० शेतकऱ्यांना निवडले आणि त्यांच्यासाठी एक बोगी बुक करुन त्यांना लखनऊहून मुंबईला बोलावले जाणार आहे. शेतकरी सातत्याने संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे त्यांचे ओझे कमी करण्याची माझी इच्छा होती. सर्वांत आधी महाराष्ट्रातील ३५० हून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्यात आले. आता उत्तर प्रदेशमधील १३९८ शेतकऱ्यांचे थकीत ४.०५ कोटींचे कर्ज फेडले आहे. या कार्यामुळे आंतरिक शांतता लाभते.

वाचा : केबीसीचे स्पर्धक मलाही प्रेरीत करतात – अमिताभ बच्चन

- Advertisement -

जवानांनाही केली होती मदत 

राज्यातील ४४ शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला बिग बी धावून गेले आहेत. ४४ शहीद जवानांच्या कुटुंबातील ११२ सदस्यांना अमिताभ बच्चन यांनी २ कोटी २ लाख रुपयांची मदत दिली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ या सोनी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या दहाव्या सिझनच्या लॉन्चिंगवेळी अमिताभ यांनी याचा खुलासा केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -