घरताज्या घडामोडीदीपिका सासूबाईंच ऐकत नाही!

दीपिका सासूबाईंच ऐकत नाही!

Subscribe

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आपल्या  वैवाहिक जीवनातील प्रत्येकक्षणाचा आनंद घेत असतात. ६ वर्षच्या रिलेशनशीपनंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा त्यांच्या घरच्यांनीही आनंदाने स्विकार केला. ते दोघेही सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. ते एकमेकांबरोबरच्या गमतीजमती शेअर करतात. एकमेकांना सल्लेही देतात. मात्र त्यांच्या लग्नानंतर त्यांना जे निगेटिव्ह कमेंट्स आल्या त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही.

दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की ती आणि रणवीर त्यांच्या वैवाहिक जीवनाता खूप आनंद घेत आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण खूप ‘मजेदार’ आहे. दीपिकाने सांगितले होते की जेव्हा ती तिच्या पालकांसमोर किंवा सासरच्यांसमोर हे सांगते तेव्हा तिला ‘३५ वर्षांनंतर बघ काय होतय असा सल्ला मिळतो. दीपिका म्हणाली की ती आणि रणवीर दोघेही याकडे फारसे लक्ष देत नाहीत. मी आणि रणवीरने ठरवले की, ३५ वर्षानंतर आमचे संबंध कसे असतली? याचा विचार करण्यापेक्षा  आता प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगूयात.

- Advertisement -

असे दिसून येतं की भविष्यातील तणावामुळे जोडपे आपल्या वर्तमानचा आनंद घेण्यास विसरतात. हे खरं आहे की लग्नाच्या आधी आणि नंतरच्या वर्षांमध्ये नात्यात मोठे बदल घडतात, पण त्याबद्दल नकारात्मक विचार करू नका. जर आपण आता हेच विचार करत राहिलो की आपले नाते भविष्यात कंटाळवाणे होईल.

दीपिका पुढे म्हणाली, लग्नाची सुरुवात ही पुढील विवाहित जीवनाचा पाया असते. अशा परिस्थितीत, भविष्याबद्दल तणाव घेण्याऐवजी या गोष्टीचा आनंद घ्या जेव्हा आपण लग्नाच्या सुरुवातीस आनंदाने जगू शकत नाही, तर मग भविष्यात हे कसे शक्य होईल?

- Advertisement -

हे ही वाचा – सोनू सूदने चाहत्यासाठी घेतली म्हैस!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -