घरताज्या घडामोडीम्हणून ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका कलाकारांनी सोडली

म्हणून ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका कलाकारांनी सोडली

Subscribe

अनेक दिवसांच्या लॉकडाऊननंतर, सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाकरिता परवानगी दिली खरी मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. मात्र या काळात कोरोनाच्या लॉकडाउनमुळे  ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतील दोन कलाकारांना मालिकाच सोडावी लागली आहे. ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतील मालतीची भूमिका साकारणारी इरावती लागू आणि स्वप्नील राजशेखर, हे यापुढे या मालिकेत दिसणार नाहीत.

त्यांनी मालिका का सोडली असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. पण काळजी करू नका आपले हे दोन्ही कलाकार अतिशय ठणठणित आणि निरोगी आहेत. आपल्या मालिकेतील लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी अतिशय मोठ्या मनाने दोघांनीही हा निर्णय निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना कळवला. त्यांच्याजागी आता अभिनेत्री रसिका धामणकर आणि अभिनेता शेखर फडके दिसणार आहेत.

- Advertisement -

कारण हे दोन्ही कलाकार ज्या भागात राहतात, ते कोरोनाचे हॉटस्पॉट्स घोषित करण्यात आले होते.  जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा, या भागातून बाहेर पडून, चित्रीकरणात सहभागी होणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या कुटुंबांच्या आणि अर्थातच मालिकेतील टीमच्या आरोग्याकरिता त्यांनी स्वताहूंन घेतलेला हा त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. अतिशय मोठ्या मनाने दोघांनीही हा निर्णय निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना कळवला.


हे ही वाचा – सुशांत आत्महत्याप्रकरण: मी माघार घेतोय – शेखर सुमन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -