घरताज्या घडामोडीरणवीरला 'कमिना' म्हटल्याने अक्षय भडकला!

रणवीरला ‘कमिना’ म्हटल्याने अक्षय भडकला!

Subscribe

अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्या अगोदरच चांगलाच चर्चेत आल्याचे दिसत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचे अनेक धमाकेदार अॅक्शन सीन दिसत आहेत. त्यामुळे हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित सूर्यवंशी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सिनेमाच्या प्रक्षेपणा आधीच हा चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला या सिनेमातून अक्षय मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीन करत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि अजय देवगण या कलाकारांची वर्णी लागणार असल्याने हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषदेच आयोजन केलं होत, मात्र यावेळी एका पत्रकाराने रणवीरला विचारलेला प्रश्न ऐकून अक्षय कुमार भडकला आणि ‘तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही’, असे अक्षयने सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येण्या अगोदरच चांगलाच चर्चेत आल्याचे दिसत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचे अनेक धमाकेदार अॅक्शन सीन दिसत आहेत. त्यामुळे हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र, एका पत्रकाराने विचारलेलल्या प्रश्नामुळे अक्षय भडकल्याचे दिसून आले. त्याचे झाले असे की एका पत्रकाराने अभिनेता रणवीर कपुरला विचारले, ‘रणवीर तू इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा कमिना आहेस, अस तुला वाटत का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने रणवीरला विचारला. ‘तुम्ही फार चुकीच बोलत आहात. हा केवळ चित्रपटातला केवळ एक संवाद आहे. मात्र, प्रत्यक्षात तस नाही आहे तुम्ही त्याचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध लावण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारू नका अशी माझी विनंती आहे’, असं म्हणतं अक्षयने पत्रकाराला रोखले.

- Advertisement -

 

- Advertisement -

रणवीरचा वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न

पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारल्याने आणि त्यावर अक्षयच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेतील वातावरण काही काळासाठी गंभीर झाले होते. त्यानंतर रणवीरने आपल्या विनोदी स्वभावाने वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अक्षयला ‘माझा अक्की, माझा अक्की मला वाचवण्यासाठी कायम धावून येईल’ असे म्हणत वातावरण शांत केले.

२७ ऐवजी २४ मार्चला प्रदर्शित होणार सिनेमा

‘सूर्यवंशी’ हा सिनेमा रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात अक्षय कुमारची मुख्य भूमिका असून अक्षय सोबत रणवीर सिंग, अजय देवगण देखील या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा आधी २७ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र याची तारीख बदलून आता हा सिनेमा तीन दिवस अगोदरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ तारखेला गुढीपाढव्याची सुट्टी आहे त्यामुळे हा दिवस नेमला असल्याचे सांगितले जावे. यामुळे सर्वांनी या सिनेमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कलाकारांकडून केल जात आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी संपूर्ण मुंबईत चित्रपटगृह रात्रभर खुली असणार आहेत.


हेही वाचा- प्रमोशनसाठी काही पण! मन फकीराच्या टीमचे अनोखे प्रमोशन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -