राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना अवघ्या 15 दिवसांनंतर शुद्ध आलेली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर मागील 15 दिवसांपासून दिल्ली येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. याकाळात त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे देखील सांगितले जात होते. त्यांच्या कुटुंबियांसह, त्यांचे चाहते देखील त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करत होते. दरम्यान, आता राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आल्याची बातमी समोर आली आहे.
राजू श्रीवास्तव यांना आली शुद्ध
राजू श्रीवास्तव यांचा सल्लागार अजीत सक्सेना याने राजूच्या प्रकृतीबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितली की, राजू श्रीवास्तव यांना सकाळी 8 वाजता शुद्धा आली. राजू यांना शुद्ध आल्याने त्यांचे कुटुंबिय खूश झाले आहेत. तसेच राजूने अनेक चाहते देखील ही बातमी ऐकूण खूप आनंदी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना सकाळी 8 च्या आसपास शुद्ध आली. त्यानंतर 9 वाजता डॉक्टरांच्या टीम ने राजूंची तपासणी केली.
सुनील पालने व्यक्त केला आनंद
Raju Srivastava gained consciousness today after 15 days, he’s being monitored by doctors at AIIMS Delhi. His health condition is improving: Garvit Narang, his Personal Secy
He was admitted here on Aug 10 after experiencing chest pain & collapsing while working out at the gym. pic.twitter.com/kmPfqRey1a
— ANI (@ANI) August 25, 2022
राजू श्रीवास्तव यांना शुद्ध येताच सुनील पाल यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. आनंद व्यक्त करत ते म्हणाले, आनंदाची बातमी मित्रांनो…राजूला शुद्ध आलेली आहे. देवाचे खूप धन्यवाद. मी म्हणायचो ना की काहीतरी चमत्कार होणार. ईश्वर हसवणाऱ्याला कधी नाराज करू शकत नाही.
राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.