बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘हेरी फेरी’ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या फ्रँचायझींपैकी एक आहे. या चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबूराव ही तीन पात्रांचे लाखो चाहते आहेत. मागील दोन महिन्यांपासून ‘हेरी फेरी 3’ प्रचंड चर्चेत आहे. असं म्हटलं जात होतं की, या चित्रपटामध्ये काम करायला अक्षय कुमारने नकार दिल्याने त्याच्या ऐवजी अभिनेता कार्तिक आर्यनला राजू म्हणून घेतले जाईल. त्यानंतर अभिनेता सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी देखील या चित्रपटामध्ये अक्षयऐवजी कार्तिक असल्याचे सांगितलं.
मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाच्या चाहत्यांनी गोंधळ घातला. सोशल मीडियावर #NoAkshayNoHeraPheri असं हॅशटॅग देखील ट्रेंड होऊ लागलं. अक्षयशिवाय हा चित्रपट पाहण्यात मजा नाही. असं चाहते म्हणू लागले.
चाहत्यांच्या मागणीनंतर अक्षय पुन्हा परतणार?
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील चाहत्यांची मागणी पाहून फिरोज नाडियाडवालाने ‘हेरी फेरी 3’साठी अक्षय सोबत पुन्हा बोलणी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनसोबत ‘हेरी फेरी 3’च्या कास्टिंगबाबत सर्व काही ठरवण्यात आलं होतं. परंतु आता पुन्हा या सर्वामध्ये बदल करण्यात येईल. मागील 10 दिवसांमध्ये फिरोजने अक्षय कुमारसोबतचे मतभेद दूर करण्यासाठी त्याची अनेकदा भेट घेतली. दरम्यान, अद्याप अक्षयने काहीही उत्तर दिलेले नाही.
‘हेरी फेरी 3’ चित्रपटाला अक्षयने का दिला होता नकार?
मागील काही दिवसांपूर्वी ‘हेरी फेरी 3’ चित्रपटाबाबत अक्षय म्हणाला होता की, “‘हेरी फेरी’ माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. मला देखील दुःख होतं की इतके वर्ष चित्रपट तयार झाला नाही. परंतु मला वाटतं आता काहीतरी वेगळा विचार करायला हवा. चित्रपटाचं जे स्क्रिप्ट होतं ते मला आवडलं नव्हतं. त्यामुळे मी नकार दिला. मला खूप विचार करावा लागेल. सोशल मीडियावर नो राजू नो हेरा फेरी असं लोक बोलत आहेत. त्यामुळे मला खूप वाईट वाटतयं. त्यांनी राजूला खूप प्रेम दिलं. परंतु आता मी त्यांची माफी मागतो. मी हेरा फेरी नाही करत. प्लीज मला माफ करा”.
हेही वाचा :